जागतिक शाकाहार दिवस
"वर्ल्ड वेगन डे" ही संज्ञा आपणा भारतीयांना फारशी आकर्षक वाटणारी नसेल कदाचित पण लक्षणीय आणि चिंतनीय अवश्य आहे. 'एक नोव्हेंबर' हा दिवस जागतिक शाकाहार दिवस म्हणून निर्धारित केल्या जाण्याचं तसं काही विशेष कारण नाही परंतु ह्या विषयाला सुप्रसारित करण्यासाठी एका दिवसाचं निमित्त असणं गरजेचं होतं. इसवी सनाच्या १९४४ व्या साली 'लुई वालिस' ह्या ब्रिटिश नागरिकाने, जो तदनंतर ह्या संस्थेचा अध्यक्ष बनला, त्याने ह्या संस्थेची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोहळा करावयाचे ठरविले. त्या वेळी त्याला येवढेच ज्ञात होते की ही संस्था पन्नास वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात स्थापन झाली परंतु निश्चित तारीख मात्र माहीत नव्हती. तेंव्हा त्याने १ नोव्हेंबर हा दिवस निश्चित केला. वेगन किंवा व्हेगन ह्या शब्दाचा जन्म होऊन एव्हाना एक शतकाहून काळ लोटला आहे. ह्या शब्दाचा संपूर्ण मानव जातीवर प्रभाव मात्र अलिकडच्या काही दशकांत प्रकर्षाने दिसू लागला आहे. मुख्यतः मांसाहाराचा अतिरेक करणारी 'गोऱ्या लोकांची वस्ती केंद्रे' आता शाकाहार म्हणजे निरोगी स्वरूपात दीर्घ आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली आहे हे मान्य करून स्वतः मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी पराकाष्ठा करीत आहेत. साहजिकच हे प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी त्यांना भारतीय उपखंडातील निरनिराळ्या शाकाहारी व्यंजनांची पाककृती आकर्षित करीत आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या जीवन पद्धती सह वैचारिक दिशा देखील आकर्षित करीत आहेत. गेल्या काही वर्षांत आपण सहजपणे अनुभव करू शकतो की जगभर सनातन हिंदु जीवन पद्धतीचा अवलंब करण्याची प्रवृत्ती जोर धरत आहे आणि त्याद्वारे जीवनाकडे आध्यात्मिक दृष्टीने बघण्याची उत्सुकता वाढत चालली आहे.
आशा करुयात येत्या काळात सगळं जग भारतीय सनातन हिंदु संस्कृतीचा अभ्यास करून आयुष्य सुखी, सुसंस्कृत आणि सुदृढ व्हावे यासाठी प्रयत्नरत राहील. रा स्व संघाच्या शांति मंत्राच्या दैनंदिन उच्चार करण्या मागचं उद्दिष्ट हेच तर आहे.
"सर्वे भवन्तु सुखीन:, सर्वे संतु निरामय:, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दु:खभाग्भवेत"
कवि 'रवि'
रविंद्र सरदेशमुख

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home