सज्जनगड
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रीया धरावी
मना चंदनाचे परी त्वां झिजावे, परी अंतरी सज्जना नीववावे
वरील चार ओळींमधून समर्थ रामदास स्वामींनी जीवनाचं तत्वज्ञान अगदी सहज करून सांगितले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रधर्म अंतरी कसा जागृत ठेवावा हे देखील चार ओळींमधून विषद केले आहे.
बलोपासना नित्य नेमे करावी, बळे आगळे कीर्ति विश्वीं भरावी
जिथे शक्ती युक्ती तथा ईशभक्ती, तिथेची मिळे देह देशासी मुक्ती सामान्य जनांकडून सुद्धा राष्ट्र आणि समाज ह्या दोन्ही स्तरांवर अशा रीतीने जीवनमान असावे ह्याची शिकवण तीन शतकांपूर्वी स्थापित करणारे महान द्रष्टा स्वामी समर्थ रामदास आणि त्यांच्या अंतरंगाचा ठाव घेणारे छत्रपती शिवाजी महाराज दोघेही विलक्षण. जय श्रीराम

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home