स्मृती आणि क्लेश
छेडीत तार असतां
सूर वेदनाची झाले
आर्त नादासवे
मन भरकटून गेले
हळूवार कां फुलाव्या
जखमा जुन्या मनींच्या
कां अश्रूही असे मज
अर्ध्यात सोडूनी गेले
मृदगंध सोडूनी कां
आभाळ ते विसावे
तरी बंध रेशमाचे
कां ते तुटोनी गेले
या पाकळ्या उगा कां
स्मरतात त्या स्मृतींना
आनंद जीवनाचे सारे विरुन गेले कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home