अजर अमर सनातन संस्कृती
सनातन धर्म आणि संस्कृती ला अंत नाही ह्याला कारण ज्ञानाचा अमोघ प्रवाह ह्या संस्कृतीचा स्थायीभाव आहे. आद्यंतरहित अर्थात जिला आदि नाही आणि अंतही नाही अशी ही संस्कृती आहे. जगातील अस्तित्वात असलेल्या किंवा लोप पावलेल्या सगळ्या सभ्यता सनातन संस्कृतीच्या कालानुरूप विस्तारलेल्या शाखा आहेत ज्या कालपरत्वे उगवतात आणि नाशही पावतात. धर्म ह्या शब्दाचा अर्थ कोणत्याही सामाजिक मान्यतांचे प्रतिक नसून तो सर्वसमावेशक सत्कृत्यांना उद्धृत करणारा एक महासागराच्या आवाक्यासारखा व्यापक शब्द आहे. ज्ञानसागर हा तिन्ही लोक व्यापून सुद्धा शिल्लक उरतो आणि त्या मुळेच असे ज्ञानी करोडोंमध्ये अत्यल्प संख्येने जन्मतात आणि आपल्या ज्ञानशक्तीमुळे अजर अमर ठरतात. योग सामर्थ्याने त्रिकाल ज्ञानी बनलेल्या महा प्रचंड शक्तीशाली व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख आपण पुराण ग्रंथांचे अध्ययन करून अनुभवतोच. अनादिकालापासून त्यांचे चरित्र ह्या सनातन संस्कृतीच्या मार्तंडांनी मानवी सभ्यतेला अविरत प्रदान केलेले आहेत. असो! बालपणापासून ऐकिवात असलेल्या अशा अनेक गूढ, अनाकलनीय गोष्टी आधुनिक साधनांच्या सहाय्याने उकलल्या जात आहेत ही पुढील पिढ्यांचं जीवनमान अधिक ज्ञानमय करतील आणि सर्व जग पुन्हा सनातन संस्कृतीच्या धर्म मार्गाचं पाईक होईल असा माझा दृढ विश्वास आहे!जय श्रीराम 🙏
