आजच्या महाराष्ट्र दिनी....
दिनांक १ मे १९६०
महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तो दिवस
तशा अनेक आठवणी आहेत ह्या दिवसाच्या
परंतु प्राथमिकतेवर काय घडले ते पाहुया
मुंबई राज्य ही व्यवस्था संपुष्टात आली. गुजरात राज्य नव्याने अस्तित्वात आले.
सी पी ऍड बेरार प्रॉव्हिंस ही प्रांत व्यवस्था संपुष्टात आली आणि विदर्भ महाराष्ट्रात अंतर्भूत झाला.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील १०५ आंदोलकांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांच्या रक्ताचा पाट अजूनही मराठी माणसाचे मन रक्ताळून जातो.
राज्य व्यवस्था बदलण्यासाठी जे काही निकष लावले गेलेत, ते कितपत यशस्वी झालेत ह्याची केंद्रातील तत्कालीन किंवा त्या नंतरच्या काळातील सरकारांनी कधी मिमांसा केली असे भासतही नाही.
महाराष्ट्र दिन आपण साजरा करण्यात असे अप्रूप ते काय ह्याचा विचार प्रत्येक मराठी माणसाने आजच्या दिवसाचे औचित्य साधून गंभीर पणे करायलाच हवा.
राजकारणाच्या खेळात सारीपाट आणि त्या वरील सोंगट्या मन मर्जीने फिरवण्याच्या काळाला शेवटचा रामराम करून एक सुदृढ सुसज्ज सर्वांगीण विकासाने युक्त असे महाराष्ट्र राज्य पुढील पिढ्यांना देणं ही आजच्या अस्तित्वात असलेल्या पिढ्यांची जबाबदारी आहे, आणि आपल्या हयातीत हे आपण घडवून आणण्यासाठी कटिबद्ध होऊयात.
तेंव्हाच महाराष्ट्र दिन साजरा करण्यात कृतकृत्यतेचं समाधान मानता येईल.
जय महाराष्ट्र
रविंद्र सरदेशमुख
१/५/२०२३

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home