माणूस प्रवृत्ती
असाच कधीतरी विचारांमागे
धावतो माणूस
आधीच्या गुंतागुतीला आणखी वळणे
देतो माणूस
विचारांच्या वलयांवर कधी स्वार होऊन
उंचच उंच शिखरे पार
करतो माणूस
तर कधी ह्याच वलयांच्या अधीन होऊन
रसातळाला
जातो माणूस
माणसाची जातच न्यारी
दऱ्या कपारी झाडे शिखरे
नद्या सरोवर सागर लहरी
दिवस रात्र संध्येच्या प्रहरी
रंगां मधून उतरवितो माणूस
कधी आतंकित भयगंडाने,
क्रूरपणे ही जगतो माणूस
कधी सूर ते स्वर लहरींचे
कधी अचानक मौन वैखरी
स्नेह, द्वेष ही क्षणांत बदली
स्तब्धांदोलित, शून्य पणाने
क्षण क्षण विरळा असतो माणूस
क्षण क्षण अगम्य असतो माणूस
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home