रामराम भौ
जय श्रीराम जी,
झाली भौ आज मोदी हटाव वाल्याइची खलबत सभा बंगळूरात झाली आन मोदी चलाव वाल्याइची संगनमत सभा दिल्लीत झाली.
तठी दिल्लीम्दी साऱ्याइनं दिलजमाई चा भरोसा दाखोला. इकळे बंगळूरात मातर जांगडगुत्ता फसल्यावानी दिसत व्हता भौ. बातम्या पायल्यावर समजलं का ह्या पिलंपोह्याइची मोयी बांध्याले फुळे निंघले व्हते ते नितिशभौ, लालूभौ म्हणं तठून पायटूनच जय रामजी की करून निंघून गेले. खलबतखान्यात गलबताची सांगड काई जमली नाई दिसते भौ. ह्या 'उपिए' ले म्हनं नवं नाव देल्लं 'इंडिया' . आता सांगा तुमाले हे चोखट लागीन काय भौ? मले मालूम हाये कां तुमी नायीच म्हनसान. हौ ना राजे हो इंडिया म्हतल्यावर कसं एकदिलानं काम कराची भावना मनामंदी येते कानी भौ? पन ह्या उपिए वाल्याइनं कवातरी एखांद्या वक्ती एकी दाखोली कां भौ?
हे सारे जत्रीत आल्यावानी, हौश्या-गवश्या- नवश्या वानी एका जागी येतात आन आपापली तुंबडी संभाळत संभाळत वापस जातात. आता भौ तुंबडीत काई पळ्ळं नशीन तं दवडीत कसं दिशीन! हाये कानी भौ?
मी तं म्हंतो भौ औंदाच्या निवळनुकाईच्या पयले तमाम माह्या माय माऊल्याईनं नियमच कराव कां ऐऱ्या गैऱ्याइले घरचा जो कोन मतदान करीन त्याची भाकर तोच बनून खाईन. सादा शिंपल बहिष्कार माय माऊल्याईचा पन मोठ्या हत्यारावानी काम करीन भौ, मले खात्री हाये भौ.
चला परयत्न करू आपल्याले जमीन तितला समाजमन तयार कऱ्याचा, बाकी सारं रामाच्या हवाली भौ. रामराम!
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home