Friday, 31 March 2023

गांधी आणि त्यांचं छद्मी जीवन

गांधी नावाच्या छद्मी संताने भारतीयांना दाखविण्यासाठी तीन माकडे चिन्हीत केली होती जी लोकांना भ्रमित करून वास्तविकत: हे सांगायची की तुम्ही काहीही बघू नका, काहीही ऐकू नका आणि काहीही बोलू नका. आणि त्या काळातील भोळ्या भाबड्या भारतीयांना वाटायचं की ती माकडे त्या मदाऱ्याचा संतत्वाचा संदेश देताहेत की वाईट बघू नका, वाईट ऐकू नका किंवा वाईट बोलू नका. साबरमती नदी काठी वास्तव्य करून देखील ज्याने चित्त वृत्तिंना शुचिर्भूत केले नाही तो घृणित वृत्तिचा एक अघोषित हुकुमशहा होता.
कसा ते विशद करून सांगण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न करतो आहे.
मोहनदास करमचंद गांधी ह्या व्यक्तिमत्वाचा विचार करताना प्रथमतः त्यांचं बालपण लक्षात घेतले पाहिजे. पोरबंदरच्या राजाचे दिवाण असलेले त्यांचे वडील, अर्थातच सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या ह्या मोहनाला तशी कशाचीही ददात नव्हती. त्या परिस्थितीला अनुसरूनच त्यांची जीवनशैली असणं स्वाभाविक होते. त्यामुळे श्रीमंत घराण्यातील जे काही चांगले वाईट संस्कार त्या वेळी असतील त्यांचा दृश्य परिणाम त्यांच्या उक्ती आणि कृती मधून दिसणारा होता. 
साहजिकच उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना विलायतेला जाणे क्रमप्राप्त होते. आधीपासून उच्चभ्रू वर्गातील असल्याने त्यांची इंग्रजांशी जवळीक होतीच, आणि त्यांच्या कल्चरचे आकर्षण मोहनाला होते हे उल्लेखित आहे.
बॅरिस्टर पदवी प्राप्त झालेल्या मोहनदास गांधी ला भारताविषयी कदापी आकर्षण नव्हते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या करियर साठी दक्षिण आफ्रिका हा देश निवडला. तेथे वकीली करीत असताना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाल्याने साहजिकच तेथील भारतीय वंशाच्या नागरिकांचा ते केंद्र बिंदू ठरले. पुढे चालून त्यांचे नेते ही बनले. येथे लक्षात घ्यायला हवे की हुकूमशाही पद्धतीने शासन करणाऱ्या इंग्रजांशी जवळीक असल्याने त्यांची नेतागिरी तेथे बहरली. करियरची साधारण २६ वर्षे दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य करून असलेल्या माणसाला अचानक भारताविषयी अतोनात प्रेम जागृत व्हावे हीच मुळात अकल्पनीय बाब आहे. मग हे घडले कसे? 
माझे आकलन असे आहे की मोहनदासाची वाढती लोकप्रियता तेथील राजकारणाला एक निराळी कलाटणी देऊ शकते अशी शंका जेंव्हा तेथील सरकारच्या मनात निर्माण झाली तेंव्हा त्यांनी गांधीचा विरोध करणं सुरू केलं. ह्यातून काही घटना घडल्या की गांधी तेथून निघून जावे असा प्रयत्न केला गेला. ब्रिटिश राजवटीला गांधी विषयी आणि गांधी ला इंग्रजांविषयी विशेष प्रेम होतेच. त्यावेळी धूर्त इंग्रजांनी गांधी ला भारतामध्ये आपला हस्तक म्हणून आयात करण्याचा धूर्त निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने पावले उचलली. इंग्रजी भाषा, इंग्रजी सोसायटी आणि त्यांच्या प्रभावाखाली जगण्याची सवय असलेल्या गांधी ला हे आमंत्रण पर्वणी ठरले. सुरुवातीला गांधी भारतात परतल्यावर त्यांनी आपल्या उपस्थितीची जनसामान्यांनी दखल घ्यावी म्हणून ज्या युक्त्या क्लुप्त्या वापरल्या त्या अगदी ठरवून केलेल्या आहेत हे अभ्यासाअंती सिद्ध करणे सहज शक्य आहे. 
पुढील जीवन गांधी यांनी महात्मा गांधी म्हणवून घेत जगण्याची स्वतः ला अशी काही सवय लावली की ते स्वतःला भारतीय जनतेचा एकमेव तारणहार मानू लागले आणि जनताही त्यांना संत मानू लागली. मी येथे अवश्य नमूद करू इच्छितो की भोळ्या भाबड्या भारतीय जनतेला कोण्या एकात देव दिसला की त्यांचं मतपरिवर्तन करणं अजिबात शक्य नाही. त्यात इंग्रजांचा वरदहस्त लाभलेला हा साबरमती चा संत पुढे भारताचा अनभिषिक्त हुकूमशहा बनला आणि तत्कालीन इतर भारतीय सुसंस्कृत आणि देशप्रेमी नेत्यांचं खच्चीकरण हेतुपूर्वक करू लागला. काय ते सत्याग्रह, काय ते उपोषण आणि सूत कातणे वगैरे सगळं काही अतर्क्य! 
शूरवीरांच्या ह्या धरतीवर हे असले थोतांड वादी व्यक्तिमत्त्व इंग्रजांनी खूप मनापासून पोसले. गांधी चा इगो जोपासायचा आणि त्या करवी येथील स्वातंत्र्य वादी चळवळीला सुरूंग लावायचा हा धूर्तपणा गांधी ला कधीच लक्षात आला नाही असे असू शकते काय? पण स्वतःच गुंफलेल्या कोषाची हाव कधी गांधी ला अंतर्मुख होऊ देणार नव्हती. फोडा आणि राज्य करा हे ब्रीद असलेल्या महा कपटी इंग्रजांनी गांधीचा फुगा कधीच फुटू दिला नाही. फोडाफोडी ला खतपाणी घालता घालता जाती जातीं पलिकडे जाऊन इंग्रजांनी हिंदू मुस्लिम विवाद जिन्ना आणि नेहरू च्या खांद्यावर बंदूक ठेवून चिघळवला आणि देश विभाजन घडवून आणले ते गांधींच्या डोळ्यासमोर. लाखो लोकांच्या कत्तली, लाखोंच्या स्थावर जंगम मालमत्तेची राखरांगोळी, अनगिनत आया बहिणींची अब्रू तसेच आबालवृद्धांची झालेली वाताहत ह्या आंधळ्या मुक्या बहिऱ्या सोंग्या ढोंग्या तरीही ह्या देशातील जनतेला संत स्वरूप वाटणाऱ्या गांधी नावाच्या भेकडाला कधीच दिसल्या नाहीत.
भारतात शरणार्थी म्हणून पळून आलेल्या हिंदुंना गांधी चा आदेश होता की त्यांनी पाकिस्तानात परत जावे, त्यांनी तिथेच मरावे. आणि ह्या आदेशाची पूर्ती व्हावी यासाठी त्यांना शरणार्थी कॅम्प सुद्धा मिळू नयेत ह्यासाठी गांधी आपलं वजन वापरण्यात मग्न होते. 
गांधी ला मारण्याचा विचार काय एकटा नाथूराम करीत होता काय? त्याकाळातील सर्व जाणत्यांना गांधी चं अस्तित्व नको होतं. त्या विचारांना अंमलात आणण्यासाठी नाथूराम प्रवृत्त झाला, एवढेच.
सोईचे राजकारण करण्याची गुरुकिल्ली गांधी ने कांग्रेस ला वरदान म्हणून दिली आणि ती सर्रास वापरता यावी म्हणून स्वतः चे नावही दिले. हाता तोंडाशी गाठ असलेल्या भारतातील गरीब जनतेला दिलासा देऊ शकेल असे वातावरण निर्माण केले जाऊ शकले नाही हे ही एक अत्यंत दुर्दैवी सत्य आहे. 
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचं ठरवताना आम्हाला गत इतिहासातची सत्यता समजून घ्यावी लागेल, अशा सर्व कुमान्यतांना मूठमाती देऊन एक बलशाली, सुसंस्कृत आणि परम आदरणीय भारत निर्माण करावा लागेल.
कवि 'रवि'

Friday, 24 March 2023

राम राम भौ

औंदाच्या गुढी पाडव्यानं भौ कानी भारताच्या राजकारनाले अल्लगच वयन देल्लं हाये भौ. कसं म्हंता? तं भौ पाहा ना तिकळे त्या राहुल बाबा नं भारत जोडो कां काय थे मोहिम काळ्ळी ह्वती ना भौ! पन थे काई नियतीले भावलं नाई राजे हो. हाव ना भौ, राहुल बाबा चा पैशापरी पैसा गेला आन जरा काई दम घेयाचा त्यानं ईचार केला की नाई तं कोर्टानं त्याले दोन वर्साची जेल ची हवा खायाची सजा सुनावली. इतलं कमी झालं का नाई तं त्याले लोकसभेतून काळून टाकलं ना भौ! 
आता ह्या सोनिया बाईंनं कराव तरी काय सांगा देवा. तिले पंतप्रधान व्हायाचं व्हतं पन थे काई जमलं नाई तं बिचारी लाडाकौतिकाच्या लेकरात आपलं सपान पुरं कऱ्याले पायत व्हती. आता कोर्टानं थे बी हवा काळून घेतली, तवा त्या माय माऊलीनं पाव्हाव कोनाकळे? सांगा भौ. राजीव गांधी ले तिनं जो काई सबूद दिला अशीन तो काई पुरा व्हतानी दिसत नाई भौ. थ्या पोरीले मंजी पिरयंका बेबीले फुळे कराव तं तिच्या लफडे बाज दाल्ल्यानं जथी नाई तथी माती खाल्ली हाये राजे हो. तिकळे जुने जानते सारे नेता लोक बाईवर रुसून पयलेच वाले व्हून बशेल हायेत भौ. गेला बाजार कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी अन त्यो सदानकदा बयाड्यावानी बोलत ऱ्हायते तो सूरजेवाला इतलेच बट्ट्याबोळ करनारे मानसं भवताल बाकी हायेत भौ. लय लय घोर लागला भौ तिच्या मांगं. मरु पायते बिचारी पन जीव काई निंगत नाई बावा! 
मले तं राजे हो लागते कां आता कांग्रेस मुक्त भारत व्हायाचा टाईम जोळ आला भौ. कसा थे बी सांगतो.
भौ जरा ध्यान द्या, तिकळे दक्षिन भारतात तीस पस्तीस वर्स झालीत कांग्रेस दिसली कां कवा? इकळे उत्तर प्रदेशात बिन हवा गुल झाली ३०-३५ वर्स झालीत. बंगाल तं निर्मम ममता बाईनं कवाच कांग्रेस अन कम्युनिस्टाइले मुठमाती दिली. महाराष्ट्रात शरदरावानं कांग्रेसले कायमच धुगधुगी वर ठुयेल हाये आन रायता रायला उत्तर पूर्व भारत तं तिकळे बी आता बी जे पी चा बोलबाला हाये भौ. आलं ना ध्यानात!? कांग्रेस मुक्त भारत व्हायाची तीथ जोळ आली वाट्टे कां नाई तुमाले. माह्या वाला अंदाज हाये कां २०२४ च्या निवळनुकाईच्या पयले एकडाव पुन्ना नोटाबंदी व्हतानी दिशिन भौ. 
चला आजच्या साठी लय झालं. पुन्ना भेटूच.
जाता जाता तुकाराम बुवा काय सांगून गेले थे सांगतो.
तुका म्हणे उगे रहावे
जे जे होईल ते ते पहावे.
मंधात एक डाव मोदीजी देहूले जाऊन आले थे काह्याले? आलं का ध्यानात?😃😃😃😃
राम राम भौ.
कवि 'रवि'



Thursday, 23 March 2023

क्रांति पुंज

क्रांतिपुंजांचे ते रूप
क्रांतिकार्याचे स्वरूप
पोवाडा गाउनिया त्यांचा
अंगी उसळावा हुरूप

देश अन स्वातंत्र्य हेची
ब्रीद हो जगण्या तयांचे
उग्र तप, धारिष्ट्य धरोनी
मारुनी मरण्या जयांचे

आज स्मरुनी त्या विभूती
प्रण करू देशाप्रती
जिंकवू अपुल्या स्मृतींना
प्रेम ते राष्ट्राप्रती
प्रेम ते राष्ट्राप्रती........ प्रेम ते राष्ट्राप्रती
कवि 'रवि'

Tuesday, 21 March 2023

परंपरेतील गुढीपाडवा आणि आजचे आपण

जय श्रीराम!
होय आजच्या जय श्रीराम च्या उच्चारणाला विशेष महत्त्व आहे कारण, आजच्या रोजी प्रभू श्रीरामाच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. जगातील अनेक ठिकाणी ह्या उत्सवाला अनन्य महत्व आहे. आणि, त्या त्या ठिकाणी जनमन श्रीराममय होऊन श्रीराम चरित्र वाचन-चिंतन-मनन आणि त्यानुसार वर्तन ह्यात रमून मंत्रमुग्ध होऊन जाते.
मित्रांनो ही झाली नवरात्रोत्सवाच्या काळात बघायला मिळालेली एक घटना. पण ह्या उत्सवाच्या दृश्य परिणामा पेक्षाही अधिक परिणाम आंतरिक स्थितीवर झाल्याचे अनुभवास येते. ' मन रामरंगी रंगले ' ह्या ओळी तून चित्त आणि वृत्तीचं अमोघ वर्णन व्यक्त झालेलं आहे. भारतीय परंपरा अशा उत्सवांनी इतक्या सहजपणे नटलेली आहे की पारमार्थिक जीवन आमच्या नसानसात आणि श्वासातही भिनलेलं आहे. त्यात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाचा सोहळा म्हणजे सुवर्ण पंचामृत योगच म्हणावा लागेल.
अनादि काळापासून श्रीरामाच्या चरित्राने सनातनी जनमानसावर इतका घट्ट प्रभाव काय म्हणून राखला असावा!? प्रश्न साधा सोपा पण विचारांना गहनतेकडे नेणारा अवश्य आहे. निरिच्छ प्रवृत्तीने राजाचं जीवन कसे जगावे ह्याचा हा परिपाठ आहे आणि त्या अर्थाने प्रत्येक प्रापंचिक व्यक्तीला ते ग्राह्य आहे. अलिकडच्या काळातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे प्रभू श्रीरामाचे निस्सिम भक्त, समर्थ रामदास स्वामींच्या सहवासातून हे मर्म समजून घेण्यात यशस्वी झाले आणि, हिंदू हृदयावर अधिराज्य स्थापित करते झाले.
सुमारे तीनशे पन्नास वर्षांच्या कालावधीत, परप्रांतीयांच्या आक्रमणाचा यशस्वी निःपात करण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहू शकला, तो प्रभू श्रीराम आणि तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास करून.
स्वातंत्र्यापश्चात काही दशके भारतीय जनमानसावर प्रभाव ठेवून असलेल्या गांधी-नेहरू ह्यांचा समाजविघातक चेहरा आता बऱ्याच अंशी उघडा पडलेला आहे आणि सार्वकालीक श्रीराम-शिवरायांची चरित्रे पुन्हा एकदा अनुकरणीय ठरत आहेत ही आधुनिक भारताची सुरुवात आहे. 
गुढीपाडवा हा सनातनी नववर्षाचा आद्य दिवस आहे आणि तो परंपरेनुसार साजरा केला जातो. त्याचप्रमाणे प्रभू श्रीराम व छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 
वसंत ऋतूतील विहंगम वातावरण आपल्या सर्वांच्या हृदयात राष्ट्राभिमान आणि धर्म प्रेम वृध्दिंगत करो ही सदिच्छा!
वर्ष प्रतिपदा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, उगादि, बिहु, गुढीपाडवा अशा अनेक नामाभिधानांनी नटलेल्या ह्या दिवशी आपण सगळे एकमेकांना अभिष्टचिंतन करुयात.
अनेकानेक शुभेच्छा आणि सप्रेम नमस्कार!
कवि 'रवि'

Tuesday, 7 March 2023

राम रंगाची होळी

राम रंगाची होळी खेळुया सकळ
राम नाम करी मन वाचा ही निर्मळ
रामप्रभूसी जव त्या स्मरिले
दु:ख अवघेचि तयाने हरिले
नाश पावे जे ते सर्व अमंगळ
राम रंगाची होळी खेळुया सकळ
साऱ्या जीवितांचा राम तो कैवारी
रावणासी देखा तो मुक्ति देवुनी वारी
रामनाम ची साक्षात अमृताचे बळ
राम रंगाची होळी खेळुया सकळ
सखा हनुमंत तया शक्ती उपासक
राम रुपी शक्ती अन तो रामाचा सेवक
राम भक्ती चे तेज हे अतर्क्य प्रबळ
राम रंगाची होळी खेळुया सकळ
कवि 'रवि'

Monday, 6 March 2023

होळी तशी आणि अशी

मित्रांनो, आज होलिका दहन! सामान्य शब्दात आपण होळी म्हणून संबोधतो तो सण. सण ह्या अर्थाने की होळी येईपर्यंत शेतकरी आपल्या शेतातील रब्बी पीकाची बेगमी करून आनंद साजरा करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन तयार असतो. वातावरण वसंताची चाहूल घेऊन सगळ्यांच्या चित्त वृत्तींना फुलवित असते आणि निसर्ग निरनिराळ्या रंगाची उधळण करीत आपला हर्ष व्यक्त करीत असतो. आख्यायिकेनुसार भक्त प्रल्हादाला शिक्षा करण्याचा उद्देश घेऊन त्याची आत्या होलिका ही त्याला घेऊन अग्निमध्ये दहन करण्याची मनीषा घेऊन एका चितेवर विराजमान झालेली असते. तिला अग्नि स्वाहा करु शकणार नाही असे वरदान प्राप्त असते. पण जगत् पालनकर्ता साक्षात भगवान विष्णु जेथे रक्षक बनून आपल्या निरागस भक्ताचे रक्षण करण्यासाठी उपस्थित असेल तेथे इतर शक्ती निष्प्रभ ठरणारच. आणि त्या अनुसार जेव्हा चिता पेटविल्या जाते तेव्हा भक्त प्रल्हादाला कोणतीही इजा न होता तो सुखरूप राहतो परंतु दुष्ट प्रवृत्तीची त्याची आत्या 'होलिका' मात्र राख होऊन जाते. तात्पर्य असे की होळी पेटविताना आपणही आपल्या मनातील सर्व दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी प्रवृत्त व्हावे आणि त्या अग्नि साक्षीने पुन्हा मन निर्मळ करून पुढील जीवन यापन करावे. मनातील दुष्टता समूळ नाश व्हावी यासाठी मोकळ्या मनाने शिव्या देणं हा देखील त्या दिवशी चा उपचार मानला गेला आहे. ती कृती जरी तद्दर्शनी विकृत भासत असली तरी तो मानसोपचाराचा एक प्रकार म्हणून परंपरेत सामावला गेला आहे. 
स्वातंत्र्य पूर्व काळात जुलमी इंग्रजांविरुद्ध बोलण्याची हिंमत सहसा दाखविणे शक्य नव्हते तेव्हा " होळी रे होळी पुरणाची पोळी आणि साहेबाच्या ××वर बंदुकीची गोळी" अशी जोरात हळी दिली जात असे आणि त्या द्वारे इंग्रजी हुकूमशाही विरुद्ध आपला राग शमविण्याचा जो तो आपल्या परीने प्रयत्न करीत असे. असो! वर्तमानात होळीविषयीच्या संकल्पना बऱ्याच अंशी बदलल्या आहेत ह्या मागे वाढतं शहरीकरण, सर्वत्र फोफावलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा, त्या शाळांवरील कन्व्हर्टेड पाद्ऱ्यांचे अलिखित प्रभुत्व आणि ते उसने अवसान आणून विचित्र हावभाव करीत उच्चारले जाणारे इंग्रजी शब्द संवाद आहेत. इंग्रजी भाषा इतकी दरिद्री आहे की त्या भाषेत अस्सल गावरान मराठी मधील एकाही शिवीला पर्याय वाची शब्द अस्तित्वात नाही. एखाद्या कन्व्हर्ट झालेल्या पाद्र्याला राग अनावर झाला की मग आपसूकच त्याचे तोंडी हा तिखट मेवा प्रवाहित झाल्याचे दिसून येते. भारतीय परंपरा मधील हा अनोखा उपक्रम मात्र आजही आमच्या गाव खेड्यांनी घट्ट कवटाळून ठेवलेला आहे. तसे पाहता शिवीचा वापर त्यांना दैनंदिन कार्यक्रमाचा एक भाग असतो. परंतु तरीही होळीच्या दिवशी अत्यंत उजागरीने ही पर्वणी साधता येते ह्याचं आकर्षण त्यांचं भान हरवून टाकते. शहरांमधील होळीचं रूप बऱ्यापैकी इंग्रजाळलेले आहे. जवळपास सगळं काही सांकेतिक स्वरुपाचे! न्यक्लियर कां काय म्हणतात ते कुटुंब हलकेच होळीच्या स्थानावर येते, एका पिशवीत भरून आणलेल्या दोन मिनि साईज गोवऱ्या हळूच बाहेर काढते. होळीत आहुती दिल्या जाणार आहोत ह्याचे भान असलेल्या त्या गोवऱ्यांना देखील त्यांचं ते संवेदनशील, हळूवार पण गदगद करून जाते. त्यानंतर स्विग्गी, झोमॅटो किंवा अशाच एखाद्या खाद्य आपूर्ति संस्थेतर्फे पुरवल्या गेलेल्या चूर्ण रूपी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. आपला लेंगा सावरत सावरत ती मायडम पांच थेंब बिसलेरी चं पाणी हातात घेऊन इकडे तिकडे उडविते. तिचा नमस्कार घेताना त्या होळीच्या मनात तिचा 'हाय बाय' स्विकारल्याचा भाव आपसूकच तरळून जातो. स्वातंत्र्य प्राप्तीच्या आसपास अवतरलेले द्विपाद जीव ह्या सगळ्या हालचाली मंदावलेल्या नजरांनी मात्र निरखून बघत राहतात आणि मनातल्या मनात आपली भडास मोकळी करून घेतात. एक मात्र खरे की निरनिराळ्या प्रकारच्या होळी स्पेशल आभूषणांनी नटलेल्या त्या होळीला त्यावेळी थोड्याच वेळात आपलं सर्वस्व राखरांगोळी होणार हे निश्चित विसरायला होत असेल खचितच. उपस्थित स्त्री समुदायाच्या आपापल्या अंतरंगात उसळणाऱ्या हेव्यादाव्यांचं आदान प्रदान संपेस्तोवर होलिका दहन पूर्णत्वास पोहचलेले असते आणि ते बघून उसासा सोडत त्या स्त्रियांचे आपापले भाबडे कुंकू इशारा होताच बुग्गु बुग्गु करीत गपगुमान आपापल्या गाळ्यात घुसतं.
तर मित्रहो, ही किंवा थोड्या फार फरकाने हे असेच दृश्य तुम्ही सारे निश्चितच अनुभव करीत असता, होय ना? 
जाऊ द्या, कांहीं का असेना, होळीचा सण साजरा करण्यासाठी सकारात्मकता अजून जिवंत आहे ह्याचा आनंद मानुया आणि खूप धुळवड करुयात.
खूप खूप शुभेच्छा!!
कवि 'रवि'