Saturday, 30 July 2022

सावल्या

 सावल्या       
गत आठवांच्या 
                                 कां कधी
                                             मिटणार आहे?
तोच मी
           पुन्हा नवा कां
                             'जन्मीं ह्या'
                                         दिसणार आहे?
रोज अंधारून येती
                          शुभ्र ते नभ 'अंतरी'
मैफली 'सुखदायकांच्या'
                           स्मरुनी 'दम' दाटे उरी
आजचा मी 'काल' जगतो
हे कधी टळणार आहे?
                  तोच मी पुन्हा नवा कां............
विश्व केले पालथे पण
                              अजुनी उरे ती 'पोकळी'
'विस्तवावर' वास्तवाच्या
                             करपेल ती पोळी 'शिळी'
भान हे 'सरत्या दिसांचे'
                             कां कधी येणार आहे?
सावल्या गत आठवांच्या..........
तोच मी पुन्हा नवा कां..............

कवि 'रवि'

Saturday, 23 July 2022

राम राम भौ

राम राम भौ, 
कसं काय चालू हाये समद्या भावाईचं? 
भौ तुमाले सांगतो काल सकाळूनच मले डोंबिवली मंजी पुन्याहून डोंबिवली ले जायाचं काम पळ्ळं आन काय सांगू राजे हो काय रस्ता, काय डोंगार, काय पाऊस! समदं वोक्केच वोक्के 😀😀👌
मले राजे हो लोनोळ्यात घुसून गोल्डन वडापाव वाल्याच्या तथून शान मूंग भजी खायाची ल..य विच्छा झाल्ती पन भौ तुमाले सोळून एकल्यानं खायाचं काई मन व्हईना भौ. तवा पोराले म्हतलं की बेटा आपून सरकेतीर फुळे जाऊन शान तथी फूळ कोर्टात थांबू, मंग तुले जे पायजेल ते खायजो बॉ! पन मले काई खायाची विच्छा नाई बावा. पोरगं लय हुशार, त्यानं वयखलं का बाबाचे दोस्त संग नाईत तं थे काई खातिन नाई तसं गेलं त्याच्या 'माय'जोळ आन म्हंते कसं का मम्मी बाबाले खाऊ घालाचं कसं थे तूच पाय. आपुन काई त्यायले समजाऊ शकत नाई, तशा आल्या मालकिन बाई आन म्हनल्या कां हमेशा का तुमच्या दोस्तायले संगं घिऊन फिरू शकता काय? आन लोनोळा काय लय दूर हाये काय? 
येजा घिऊन त्यायले एखांद्या रोजी!!
पन खरं सांगतो भावाइहो मन कसनुसं करून मंग म्या तथी जास्त नाई पन एक वळापाव खाल्ला, एक चनाभेळ खाल्ली, लेकानं लयच म्हतलं तवा छोले भटुरे खाल्ले आन उताऱ्यासाठी एक चहा पिऊन ढेकर देत पुन्ना गाडीत यिऊन बसलो. 
सारी कामं उरकून रातच्याले घरी आल्यावर काई सुचेना तवा आडवा झालो तं पायटुनच जाग आली. तवा इचार केला का बॉ सांगून टाकाव भावाइले कालची हकीकत. 
वाचून झाल्यावर जरूर जरूर सांगजा भावाइहो तुमाले कसं वाट्टे तं. 
बाकी सारं ठीक हाये भौ, राम राम!
कवि 'रवि'

एक पेशकश

वो आते हैं रोज़ दरीचे पे
कहते हैं इश्के तौबा
नज़र फेर कर निकल जाते हुए
हमें घायल छोड जातें हैं

आशनाई से निजात पाकर
जब पलटते हैं हम दिन दुनिया की तरफ
उनके अब्बाजान जेहन की 
सिलाई उधेड़ जाते हैं 

हाय रे किस्मत और तेरा जलवा
हम तेल लगा लगाकर
पिटने के लिए
रोज़ चले आते हैं

इश्क नासूर
न जिलाता है न मरने देता है
मज़हार की दहलीज से एक पल
उधार मांग आते हैं

तू मुहब्बत न कर सकीं
ना सही
ये दिलो ईमान तेरे सदके में
रख कर चले जाते हैं

कवि 'रवि'

भिजवणारा

होय मी भिजणार
पावसात भिजणार
अवकळणीच्या, मृगसरींच्या, वळवाच्या, झडीपाण्याच्या ........ पावसात भिजणार

होय मी भिजणार पावसात भिजणार
दऱ्या खोऱ्यांना, डोंगर शिखरांना, शेता पिकांना
झाडा पानांना भिजवणाऱ्या...
पावसात भिजणार

होय मी भिजणार पावसात भिजणार
चित्त वृत्तींना, छंद काव्यांना, जीवशिवांना
भिजवणाऱ्या..... पावसात भिजणार

होय मी भिजणार पावसात भिजणार 
सुख दुःखांना, कष्ट वेदनांना, चिंता मुक्तींना
गती प्रगतींना छेदणाऱ्या... पावसात भिजणार

होय मी भिजणार पावसात भिजणार
निसर्गाच्या कुशीतून, विसर्गाच्या मुशीतून
धो धो बरसणाऱ्या .... पावसात भिजणार

होय मी भिजणार पावसात भिजणार
निसर्गाच्या कुशीतून, विसर्गाच्या मुशीतून
धो धो बरसणाऱ्या .... पावसात भिजणार

होय मी भिजणार पावसात भिजणार
ऋषी मुनींच्या, संत महंतांच्या, अभंगातून 
कविच्या कवितेतून कवयत्रींच्या पद्यातून लेखकांच्या गद्यातून 
आसवातून हास्यातून अश्रूतून मोदातून 
सर्वकाही व्यापून अधिक उरणाऱ्या
पावसात भिजणार... होय मी भिजणार
कवि 'रवि'

उठा उठा पहाट झाली

उठा उठा पहाट झाली
गुरू पूजनाची वेळ झाली

शिष्यत्व अपुले भगव्या साठी
वर्तविण्याची वेळ झाली

सेवा व्रत 'संस्कार' आपुला
भगव्या साठी देह वाहिला 
हिंदु हिताचे रक्षण करण्या
"जागृत व्हा" हो वेळ झाली

धर्म भेद ना जाति भेद ही
भगव्या ची सर्वांस साऊली
राष्ट्रोत्थाना साठी समर्पण
करण्याची ही वेळ झाली

उठा उठा हो पहाट झाली
गुरू पूजनाची वेळ झाली 

कवि 'रवि'

१७/०७/२०२२

परमपूजनीय भगवा ध्वज
रा स्व संघ की आर्यभट्ट शाखा के गुरु पूजन समारोह में उपस्थित सभी स्वयंसेवक गण। 
चूंकि आज के हमारे उपस्थिति का विशेष महत्व है कि हम आज हमारे प्रथम गुरु परम पूजनीय भगवा ध्वज को अपनी निष्ठा और रा स्व संघ के प्रति हमारी श्रद्धा का परंपरा अनुसार अर्पण करते हैं।
किंतु किसी के मन में यह विचार उत्पन्न होना स्वाभाविक है कि श्रद्धा और निष्ठा तो हम रोज ही नियमित रूप से शाखाओं में उपस्थित रहकर ध्वज प्रणाम से लेकर हमारी दैनंदिन गतिविधियों में शामिल रहकर व्यक्त करते ही हैं और जब भी संघ द्वारा आयोजित सेवा कार्य में आवश्यकता होती है तो अपना योगदान भी देते हैं। फिर गुरु पूजन का विशेष औचित्य क्या है? आइये आज हम इसी विषय का उहापोह करते हैं। 
जैसा कि हम सब जानते हैं और मानते भी हैं कि मनुष्य को अपने जीवन समय में दो साधनों का उपयोग जीवन के अंतिम क्षण तक रहता है, जो कि विद्या और बुद्धि है। इन दो

किसान

पूर्वी 
होते राबणारे हात
त्यांना खून पसीन्याची साथ
बैलजोडी अन् गाडी नांगर
न्याहारीला कांदाभाकर
पायात असे टायरची वहाण
अंतरी परी विचार महान
पिकांसाठी श्रद्धा होती
देवकृपा सुद्धा होती
पौष्टिक अन्न माती देई
आनंदे पसा भरून घेई
गोठा की जणू दागिनाच तो
नफा खरोखर 'पाहिना'च तो
अर्थशास्त्र सोपे होते
अन्न वस्त्र हे निकड ची होते
दिले तयाचे स्वागत होते
सुख शांती ते मागत होते
काळ बदलला दैव बदलले
माती संग नाते ही बदलले
              आता
शेती नुरली फार्मलॅंड उगवली
कल्टिवेटर अन ट्रॅक्टर आली
दाणा खाती अन खते पुरव

life is just one

May there be billions
lives around
You only live once

Nothing is left or
Nothing is achieved
To be a human
It's a life time chance 

Pray for whatever
You think it could be
World is virtual
But the feelings are true

It's all that
A story of life
No more grievance
Or no more strife

Poet 'Ravi'

Tuesday, 5 July 2022

पाऊस आणि मन

वर्षा ऋतु अन मन हे माझे
हर्ष मनाला चपखल साजे

रिप रिप टिप टिप थेंब ही गाती
फुले पाने त्या संगे नाचती
हळूच येते मंद झुळुक ती
संवेदना त्या मग मोहरती.... वर्षा ऋतु अन..

गंध मातीचा जणु की अमृत
श्वासाला करी धुंद तयाप्रत
शरीर अवघे होई रोमांचित
जगणे अवघे पुन्हा प्रफुल्लित..... वर्षा ऋतु अन

ये रे पावसा असा बरस तू
जीव शिवांची मिटवी तरस तू
त्राता माता भ्राता सर्व तू
देवाचे वरदान आम्हा तू...... वर्षा ऋतु अन

कवि 'रवि'

Sunday, 3 July 2022

देवेंद्र, राजकारण, सत्ता आणि व्यक्तिमत्व

वयाच्या किशोरावस्थेपासून समाजातील विविध घटकांचा सहज आढावा घेण्याची सवय असलेला हा, आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक. पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, त्यानंतर नागपूर महानगरपालिकेचा नगरसेवक बनला त्या वेळी वय वर्षे २३. आणखी पुढे महापौर बनला तेंव्हा वय वर्षे २७. चढती कमान अशी की लगोलग भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा सदस्य अर्थात आमदार म्हणून निवडून आला आणि तेंव्हा पासून आज वयाची ५१ वर्षे झालीत सतत महाराष्ट्रधर्म समजून आपल्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण न थकता न कंटाळता समाज सेवा करीतच आहे. स्वयंभू नेतृत्व काय असा प्रश्न कुणाला पडत असेल तर त्याने देवेंद्र फडणवीस यांचा जीवन प्रवास अभ्यासावा. त्यांना 'अजातशत्रू ' असं संबोधलं जातंय ही राजकारणात वावरणाऱ्या कुणाला पण विलक्षण अशी उपाधी आहे आणि ती सार्थ रुपाने देवेंद्र फडणवीसांना लागू पडते. 
त्यांना नामोहरम करण्यासाठी क्षूद्र विचारसरणीच्या लोकांनी, माध्यमांनी किंवा हेतुपुरस्सर द्वेष करणाऱ्यांनी नको नको ते विभत्स प्रकार अवलंबिले पण जनमानसात भिनलेला हा नेता स्वतः कधी डगमगला नाही आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्याला पडू दिले नाही.
राजकीय परिपक्वता म्हणजे काय हे त्यांनी नुकतेच आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. महत्वाकांक्षेपेक्षा समाजाभिमुख निर्णय किती महत्त्वाचे असतात ह्याचं प्रात्यक्षिक त्यांच्या अगदी ताज्या कृतीतून सर्वांसमोर उघड झाले आहे. विधानसभेत सामान्य आमदार असताना पासूनच ज्याला अभ्यासू, विचारशील, विनयी आणि अशा अनेक विशेषणांनी संबोधले गेले त्या देवेंद्र फडणवीसांनी विरोधीपक्षनेते पद आणि मुख्यमंत्री पद दोन्ही भूषवितांना तेवढाच संयम आणि समजूतदार पणा दाखविला आहे.
ह्याची साक्ष त्यांचे विरोधक देखील विधान भवना बाहेर मुक्त पणे देतात हे त्यांच्या विरुद्ध प्रचार करणाऱ्या माध्यमांतील पत्रकार किंवा वृत्त समीक्षक सहजपणे सांगतात.
सद्य परिस्थितीतील घटनांचा हवाला देऊन विरोधकांनी त्यांच्या विरुद्ध वावड्या उठवायला सुरुवात केली आहे की वरिष्ठांनी त्यांचे पंख छाटण्याकरिता त्यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले आहे वगैरे वगैरे. 
मित्रांनो येथे विशेषत्वाने हे आठवावे लागेल की २०१४ साली त्यांना मुख्यमंत्री पदी बसविण्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रमुख सहभाग होता. पक्षांतर्गत तसेच पक्षाबाहेरील राजकीय शक्तींनी त्यांना भरघोस विरोध दर्शविला असताना देखील मोदींनी तेंव्हा कुणाचेही काही चालू दिले नाही. २०१९ च्या निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळाले तेही देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने पारडे झुकवू नये म्हणून त्या विजयाचे श्रेय इतरांना मिळावे असे प्रयत्न होत असताना हाच देवेंद्र त्या निवडणुकांच्या विजयाचे श्रेय संपूर्ण कॅडर आणि ज्येष्ठ नेत्यांना देता झाला. मध्यंतरी च्या काळात ज्या काही पोट निवडणूका किंवा नगर परिषद, ग्राम पंचायत किंवा इतर तदृश निवडणुका मधील यश ही त्याने सर्वांच्या मेहनतीला दिले. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ असो की आपदा परिस्थिती असो प्रत्येक वेळी स्वतः पुढे होऊन त्या त्या स्थळी पोचताना त्याने कधी जिवाची पर्वा केली नाही. आजवर ४ वेळा हेलिकॉप्टर दुर्घटनेतून दैवी कृपेने जीवंत असलेला आणि जनसेवेसाठी सही सलामत असलेला देवेंद्र हा एकमेव नशीबवान जननेता आहे. 
महाभारतातील एक प्रसंग मला या ठिकाणी नमूद करावासा वाटतो. तो असा की कौरवांच्या आमंत्रणावरून पांडव द्यूत खेळण्यासाठी अत्यंत अनिच्छेने परंतु त्या काळातील रिती नुसार पोचले. द्यूतासाठीचे फासे शकुनी ने जरासंधाच्या अस्थींचे बनवून घेतले त्या मागील उद्देश असा की ते पांडवां विरुद्ध दान देतील. पण भीमाला घाबरून ते फासे पांडवांच्या पारड्यात दान टाकू लागले. हे आश्चर्य समजून येईपर्यंत पांडव विजयी होत राहिले पण महाधूर्त शकुनी ने त्याची तोड शोधली आणि दुसरे दिवशी भीमाला सर्वात मागे बसायला भाग पाडले. परिणामी कौरवांच्या बाजूने दान मिळू लागताच शकुनी ने पांडवांना द्रौपदीसह सगळं काही पणात हारायला लावले, वनवास अज्ञात वास वगैरे वगैरे अटी लादल्या, हे निश्चित करण्यासाठी. त्या वेळी धर्मराजाने मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे जरी म्हटले नव्हते तरी पुन्हा येण्याची सुप्त प्रतिज्ञा मात्र त्याने नक्कीच केली होती हे पुढील काळात स्पष्ट झाले. 
शिवसेनेच्या तळागाळातील सैनिकांनी ज्यांना उत्तम रित्या मतदान करून भाजपासोबत सत्ता सांभाळण्याचा कौल २०१९ ला दिला होता, त्याला झुगारून कौरवी वृत्तीच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी जेंव्हा अभद्र युती करून सरकार बनवले तेंव्हाच हे ही निश्चित झाले होते की ह्या कौरवांचा नि:पात होणार. 
फार काळ वनवासात न राहता वर्तमान पांडवांनी अज्ञातवास त्यागला आणि सत्तांतर घडवून आणले.
मित्रहो ह्या सगळ्या नाट्यात देवेंद्र फडणवीस यांची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्याइतपत आपण सगळे सूज्ञ आहात. येथपासून पुढे जसजशी ह्या सरकारची वाटचाल सुरू राहील तसतशी आपल्याला खात्री देखील होईल की देवेंद्र हा अति महत्त्वाकांक्षी नाही तर महाराष्ट्रातील जनतेचा "सखा" आहे. 
नवगठीत शिवसेना भाजप युती सरकारला कुणी कितीही अपशकून किंवा दृष्ट लावण्याची शिकस्त केली तरीही हे सरकार आपला कार्यकाळ मजबुतीने चालेल आणि जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करील ह्या विषयावर मी नि:शंक आहे.
कवि 'रवि'






आ..रा..रा...रा...रा कुठं गेलास रं संज्या

आ..रा..रा...रा...रा कुठं गेलास रं संज्या
कां उपटत बसलाय सौताच्याच झिंज्या

तुया बादशायत ले कुचपडून टाकलं
खराब झाला तुवा पिकवलेला मांजा

भका भका बकत व्हता भाषा लई माजोरी
आता तुया घशात फसला हाय का भौ रांझा

सायबानं तं ग(आं)ड दाखोली देल्ली भावा तिर्री
तुले बनोलं भावा बारा पिपळावरचा मुंजा

हिंदु हिंदु म्हंते पन दिसते  जाळीदार टोपी
लबाड बोलून बोलून झाला तुवा दिमाग गंजा 

आ..रा..रा...रा...रा कुठं गेलास रं संज्या
कां उपटत बसलाय सौताच्याच झिंज्या
कवि 'रवि'

Friday, 1 July 2022

तेल ही गेले तूप ही गेले हाती उरले धुपारणे

मराठी भाषेतील प्रसंगोपात्त अशा अनेक म्हणींपैकी "तेल ही गेले तूप ही गेले हाती उरले धुपारणे" ही एक म्हण. वरील नऊ शब्दांत खूप मोठा आणि चपखल असा अर्थ सामावलेला आहे जो नुकत्याच पदावनत झालेल्या तथाकथित महा विकास आघाडीला लागू पडतो. ऐंशी पार झालेले स्वनामधन्य राजकारण धुरीण जाणते राजे आधुनिक चाणक्य आणि इतरही अनेक उपाधींचा जोगवा उराशी बाळगून देशाचा गाडा हाकण्याची स्वप्ने दशकांपासून बघत असलेले साहेब, २०१९ साली गोडगोड 🥕 गाजरं घेऊन राजकारणाच्या बाजारात उतरली. पाचवीत गटांगळ्या खाणाऱ्या मुलाला जर कां मॅट्रिक मध्ये मेरिट मिळवून देतो असे सांगितले तर तो जशा माकड उड्या मारत अती उतावळा होईल तद्वत आधुनिक धृतराष्ट्र आणि आंधळ्या संजयाचे झाले आणि विधीनिषेध शून्य 'महा भकास बिघाडी'ने राजकीय गर्भोदर फोडून महाराष्ट्र राज्य रसातळाला नेण्यासाठी जन्म घेतला. तीन भिन्न प्रकृतीच्या रसायनांचे कडबोळे एकत्र येऊन जेव्हा असं काही घडते तेव्हा त्यातून विषादच निर्माण होतो, "अती महत्त्वाकांक्षे पोटी आत्मघात" अशी स्थिती निर्माण होते. ह्या महा भकास बिघाडीच्या बाबतीतही तेच झाले. त्यांनी जो भस्मासूर उभा केला तो संस्कारहीन आहे, आत्मघाती आहे हे कळू नये इतपत जेव्हा मती भ्रष्ट होते तेव्हा रसातळाला जाण्यावाचून पर्याय उरत नाही.
अनैसर्गिक संकराची परिणती ठरलेल्या ह्या बिघाडीचं आयुष्य एकतीस महीने टिकावे हे ही एक नवलंच म्हणावे लागेल. असंस्कृत विचारांशी सुसंस्कृत विचारांची लढाई असल्याने कदाचित इतका वेळ लागला असावा. असो! 
महाराष्ट्र राज्य म्हणजे आमची खाजगी मालमत्ता आहे आणि येथे आम्ही जे करू ते मान्य समजावेच लागेल अशी जी नशा चढली होती ती पुन्हा अनेक दशके डोक्यात जरी आली तरी धडकी भरेल असा हा परिणाम आपण नुकताच बघितला आहे. निर्लज्ज पणालाही मर्यादा आहेत हे ह्या प्रसंगी सिद्ध झाले आहे. राज्यातील जनतेला आव्हान ठरलेल्या जीवघेण्या कोरोना साथीला भ्रष्टाचाराचं कुरण समजून ज्यांनी कुणी हात बरबटून घेतले, त्या प्रत्येक व्यक्ती किंवा संस्थांना जनता नीट समजून आहे आणि ह्या पुढे त्यांचं वाटोळं केल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून मी शिर्षक दिलंय "तेल ही गेले तूप ही गेले हाती उरले धुपारणे".
आता धुपारणे घेऊन जनतेसमोर कितीही ऊद जाळायचा खटाटोप केला तरी कधीच उखळ पांढरं करता येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
(कवि 'रवि')