सावल्या
सावल्या
सावल्या
राम राम भौ,
वो आते हैं रोज़ दरीचे पे
होय मी भिजणार
उठा उठा पहाट झाली
परमपूजनीय भगवा ध्वज
May there be billions
वर्षा ऋतु अन मन हे माझे
वयाच्या किशोरावस्थेपासून समाजातील विविध घटकांचा सहज आढावा घेण्याची सवय असलेला हा, आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक. पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, त्यानंतर नागपूर महानगरपालिकेचा नगरसेवक बनला त्या वेळी वय वर्षे २३. आणखी पुढे महापौर बनला तेंव्हा वय वर्षे २७. चढती कमान अशी की लगोलग भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा सदस्य अर्थात आमदार म्हणून निवडून आला आणि तेंव्हा पासून आज वयाची ५१ वर्षे झालीत सतत महाराष्ट्रधर्म समजून आपल्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण न थकता न कंटाळता समाज सेवा करीतच आहे. स्वयंभू नेतृत्व काय असा प्रश्न कुणाला पडत असेल तर त्याने देवेंद्र फडणवीस यांचा जीवन प्रवास अभ्यासावा. त्यांना 'अजातशत्रू ' असं संबोधलं जातंय ही राजकारणात वावरणाऱ्या कुणाला पण विलक्षण अशी उपाधी आहे आणि ती सार्थ रुपाने देवेंद्र फडणवीसांना लागू पडते.
मराठी भाषेतील प्रसंगोपात्त अशा अनेक म्हणींपैकी "तेल ही गेले तूप ही गेले हाती उरले धुपारणे" ही एक म्हण. वरील नऊ शब्दांत खूप मोठा आणि चपखल असा अर्थ सामावलेला आहे जो नुकत्याच पदावनत झालेल्या तथाकथित महा विकास आघाडीला लागू पडतो. ऐंशी पार झालेले स्वनामधन्य राजकारण धुरीण जाणते राजे आधुनिक चाणक्य आणि इतरही अनेक उपाधींचा जोगवा उराशी बाळगून देशाचा गाडा हाकण्याची स्वप्ने दशकांपासून बघत असलेले साहेब, २०१९ साली गोडगोड 🥕 गाजरं घेऊन राजकारणाच्या बाजारात उतरली. पाचवीत गटांगळ्या खाणाऱ्या मुलाला जर कां मॅट्रिक मध्ये मेरिट मिळवून देतो असे सांगितले तर तो जशा माकड उड्या मारत अती उतावळा होईल तद्वत आधुनिक धृतराष्ट्र आणि आंधळ्या संजयाचे झाले आणि विधीनिषेध शून्य 'महा भकास बिघाडी'ने राजकीय गर्भोदर फोडून महाराष्ट्र राज्य रसातळाला नेण्यासाठी जन्म घेतला. तीन भिन्न प्रकृतीच्या रसायनांचे कडबोळे एकत्र येऊन जेव्हा असं काही घडते तेव्हा त्यातून विषादच निर्माण होतो, "अती महत्त्वाकांक्षे पोटी आत्मघात" अशी स्थिती निर्माण होते. ह्या महा भकास बिघाडीच्या बाबतीतही तेच झाले. त्यांनी जो भस्मासूर उभा केला तो संस्कारहीन आहे, आत्मघाती आहे हे कळू नये इतपत जेव्हा मती भ्रष्ट होते तेव्हा रसातळाला जाण्यावाचून पर्याय उरत नाही.