Tuesday, 22 February 2022

देव देव्हारा आणि भक्ती

ह्या पृथ्वीवरील प्रत्येक मानव समूहाचा देव ह्या भावनेवर दृढ विश्वास आहे. मी ह्या ठिकाणी "देव" ही भावना असे म्हंटल्यावर काही जणांना त्या बद्दल आक्षेप घ्यावासा वाटेलही कदाचित. पण माझी सर्वांना विनंती आहे की माझं संपूर्ण कथन ऐकल्या शिवाय मत बनवू नये किंवा प्रदर्शित देखील करू नये. तर विषय असा की देव ही आम्हां मानव वंशियांची हजारो वर्षांपासूनची दृढ भावना आजपर्यंत अबाधित आहे. किंबहुना जसजशी सामाजिक स्थिती बदलू लागली आहे, तसतशी ही भावना आणखिनच बळकट होत चालली आहे. ह्या दृढ भावनेचं प्रकटीकरण आज आपण प्रत्येक धर्म_पंथ_समुदाय ह्यांच्या वर्तनातून बघतो आहोत. थोडक्यात काय तर देवावरील ह्या श्रद्धेशिवाय कुणाचंही जगणं सुसह्य नाही. असो!
देव्हारा ही संकल्पना केवळ हिंदु धर्मियांपुरतीच मर्यादित आहे कां? तर तसं अजिबात नाही आणि कुणाही हिंदु धर्मियाने तशा भ्रमात राहू नये. फरक इतकाच आहे की हिंदु धर्मीय आपापल्या घरी एका विशिष्ट स्थानी एक देवघर तयार करून त्यात आपल्या आराध्य दैवतांच्या प्रतिमा ठेवून नित्य नेमाने त्यांची पूजा अर्चा करतो. इतर पंथातील अनुयायी त्यांच्या त्यांच्या श्रद्धांनुरूप कुणी प्रतिमा, कुणी छायाचित्रे, कुणी थडगी तर कुणी दोन हातांच्या तळव्यात देव आहे असे मानून त्या त्या प्रतिकाशी एकरूप होऊन भक्ती करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक धर्म पंथाचे लोक सामुदायिक प्रार्थना स्थळे बांधून आपल्या भावना व्यक्त करतातच.
सनातन संस्कृतीच्या अतीशय प्राचीन आणि दुर्मिळ साहित्य रचनांमधून त्या परमात्मा परमेश्वराच्या अस्तित्वाची दखल घेतली गेली आहे आणि त्याच्या मानवजातीवरील उपकारांचे स्तवन करण्यासाठी अनेक साहित्य कृती निर्माण केल्या आहेत, हा प्रवाह आजही अनिर्बंध रितीने चालू आहे. परिणामी लक्षावधी कवने पहावयास मिळतात आणि त्या अनुषंगाने विचार भेद देखील अस्तित्वात आहेत. भक्ति कशी असावी ह्या बाबत मतभिन्नता प्रचंड असली तरी ईश्वराच्या अस्तित्वाविषयी एकमत आहे हे नाकारता येणार नाही. 
हिंदु धर्मात भक्तिचे असंख्य प्रकार असणं हे स्वाभाविक आहे कारण या संस्कृतीचा इतिहास लक्षावधी वर्षांचा आहे ज्या मुळे वेळोवेळी पूजा, प्रार्थना विधीमध्ये बदल घडत आले आहेत. परंतु मूळ स्वरूपात दोन प्रमुख प्रकार विषद करण्यात आले आहेत, त्यांपैकी एक म्हणजे सगुण साकार रुपाची भक्ति, जी उपचारांसह करावी अशी आहे. आणि दुसरी म्हणजे निर्गुण निराकार 'रूपहिन_वर्णहिन' अशा स्वरुपाची भक्ति.
सगुण साकार ईश्वराच्या पूजा विधी चे असंख्य प्रकार आहेत, किंबहुना ते घराघरात आपापल्या सोयीनुसार निश्चित केले गेले आहेत आणि त्यांवर कुणाला आक्षेप घ्यावासा वाटत नाही कारण अंतिम ध्येय साध्य व्हावे असा विस्तृत विचार त्यामागे असावा. प्रतिकांसन्निध बसून प्रार्थना करणं हा सोप्यात सोपा असा भक्तिचा मार्ग आहे. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. ह्या पेक्षा थोडं पुढे जाऊन काही मंडळी व्रते_अनुष्ठाने करतात ज्याला काही अंशी हठयोगाची किनार असते. जसजशी ईश्वर भक्तीची आवड निर्माण होते, तसतशी ती विविध प्रकारे अनुसरण्याची ओढ जागृत होते. यातूनच समविचारी लोक सार्वजनिक स्तरावर मोठमोठ्या उत्सवांचे आयोजन देखील करतात. असो! ही झाली सगुण साकार रुपाची भक्ति करण्यासाठी अवलंबिलेली काही उदाहरणे. ह्या सगुण साकार भक्तिच्या सहाय्याने काही नवस सायास करून इप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे हा देखील एक प्रकार अस्तित्वात आहे.
निर्गुण निराकार भक्ति पंथाचा अवलंब करण्याची प्रथा बहुत: साधक, तपस्वी किंवा संन्याशी आणि भटकंती करावी लागते अशा लोकांची सुविधा म्हणून प्रचलित आहे. ह्या प्रथेत नाम संकीर्तन अर्थात ईश्वर स्तुती करताना त्यात रममाण होऊन ब्रह्मानंदी टाळी लागल्याचा अनुभव घेण्याची क्रिया सुद्धा अवधारित आहे. 
सगुण साकार भक्ति ही प्रपंचात राहून सुद्धा करता येते तर निर्गुण निराकार भक्ति पंथाचा अनुयायी सहसा निर्विकार बनण्याचा प्रयत्न करतो. सर्व संग परित्याग करून केवळ ईश्वर भक्तीची परिपूर्णता साधणं हे एकमेव ध्येय निष्ठूर पणे अंगिकारणे हा ह्या भक्ति प्रकाराचा मूळ गाभा आहे.
समारोप करताना हे विशेषत्वाने लिहावेसे वाटले की गंमत आणि विरोधाभास असा की, ईश्वर एकच आहे हे सगळ्या धर्माच्या धुरिणांना मान्य आहे तरीही त्यांना एकात्मतेने भेदभाव विरहित मानवी जीवन यापन कशा पद्धतीने करता येईल ह्याचा सूक्ष्म विचार करणं पसंत नाही. उलटपक्षी आधुनिक प्रचार माध्यमांचा अमर्याद वापर करून ही मंडळी धर्माधिष्ठित वसाहतवाद स्थापित करण्यासाठी आसुसलेली दिसतात. 
अशा ह्या विचित्र सद्यस्थिती मुळे मानवी सभ्यतेची अतोनात हानी होत आहे.
कवि'रवि'

Saturday, 19 February 2022

मनमोहन उवाच

दिनांक २०फेबृअरी २०२२ च्या दैनिक जनसत्ता ह्या वृत्तपत्रांमध्ये छापलेल्या बातमीनुसार मौनी बाबा अर्थात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग जे काही बडबडले ते किती समय सापेक्ष आहे हे सर्वांना कळावे म्हणून हा लेखनप्रपंच करीत आहे.
त्यांनी आपल्या कथनात सांगितले की 'मोदीजी आणखी २० वर्षे जरी पंतप्रधान म्हणून राहतील तरी ते नेहरूला बोल लावल्या शिवाय राहणार नाहीत'.
ह्या ठिकाणी मौनीजींना असे सांगावेसे वाटते की होय मौनीजी ते तसे नक्कीच करतील. कारण, स्वातंत्र्य प्राप्ती नंतर ह्या देशातील भोळ्या भाबड्या जनतेने पूर्ण विश्वास दाखवून त्यांना मोठ्या आदराने पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आणि विश्वासाने १७ वर्षे
त्यांच्या कडे आशेने बघितले. पण वास्तवात हा माणूस त्यांच्या अपेक्षांना खरा उतरला नाही. उलटपक्षी, सत्तेचा अमर्याद उपभोग घेता यावा म्हणून कांग्रेस जनांना "फोडा आणि राज्य करा" असा मंत्र शिकवून गेला.
सत्तर वर्षे लोटावी लागली येथील जनतेला त्या विषवल्ली च्या विळख्याला समजायला. जनता पुन्हा त्या दुष्टचक्रात फसू नये म्हणून मोदींना सतत नेहरूंच्या कुकर्माचा पाढा वाचत राहणे क्रमप्राप्त आहे. 
इत:पर मौनी बाबाला कधी काही बोलावेसे वाटलेच तर त्यांनी निदान मोदींचा समाचार घेण्याचं दिवास्वप्न बघू नये. मोदींचा एक एक शब्द तुमची चिरफाड करण्यात कसूर ठेवणार नाही.
रविंद्र सरदेशमुख




Friday, 18 February 2022

परम पूजनीय श्रीमान गोलवलकर गुरूजी

भारतीय संस्कृति एवं हिंदु जनजागृति को समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के द्वितीय सरसंघचालक परम पूजनीय श्रीमान गोलवलकर गुरूजी का जन्म दिन आज है। उच्च विद्या विभूषित श्री गुरुजी हिंदु धर्म के गाढ़े अभ्यासक थे। १९०६ वर्ष उनका जन्म वर्ष है और १९७३ उनके देहांत का वर्ष है। आजन्म स्वयंसेवक रहे श्री गुरुजी सन १९४०से १९७३तक सरसंघचालक रहे। परम पूजनीय आद्य सरसंघचालक डॉ केशव बलिराम हेडगेवार जी पर उनकी नितांत श्रद्धा थी और डॉक्टर साहब के निस्सिम अनुयाई भी बने रहे। उनके आचरण में अथवा वक्तव्य में कदापि राजनीति का अन्तर्भाव नहीं रहता था, बस धर्म रक्षा, मानव सेवा और वैश्विक एकात्मता का संकल्प लिए वे लाखों स्वयंसेवकों का आदर्श बने रहे। समाज में जहां कहीं पीडा नजर आई, श्री गुरुजी ने उसका निराकरण करने हेतु संघ स्वयंसेवकों को प्रेरित किया। संघ प्रचारकों का एक वैषिष्ट्य होता है कि वे हिंदुस्थान के लगभग सभी प्रदेशों से वाकिफ होते हैं, इस उपक्रम के बहुधा श्री गुरुजी उत्तम उदाहरण थे। सन्यस्त वृत्ति के कारण उनके चेहरे पर एक विलक्षण प्रतिभा दृगोचर होती थी। विद्वत्ता से प्रचुर उनके बौद्धिक, संघ स्वयंसेवकों के लिए संपदा समान है, और उनके द्वारा बताए गए अमृत वचन वर्तमान में भी दिशा दर्शन के कारक हैं। संघ कार्य से किसी भी प्रकार की प्रसिद्धि या वैयक्तिक लाभ की अपेक्षा नहीं रखी जानी चाहिए ऐसा अलिखित नियम संघ अनुशासन में है, और डॉक्टर जी से लेकर वर्तमान सरसंघचालक डॉ मोहन भागवत जी तक सभी के चरित्रों का यह प्राथमिक स्वभाव दर्शन है।
बाल्यावस्था से संघ के साथ जुड़े रहने वाले लक्षावधी संघ स्वयंसेवकों तथा संघ अधिकारी गण के मन का भाव भी इन्हीं संस्कारों को अग्रेषित करता है। इस सदा वत्सल मातृभूमि का जन्मोपात्त ऋण मानकर उसकी सेवा करना अपना दायित्व समझने की परंपरा संघ में विकसित होती है और राष्ट्र धर्म से प्रेरित अधिकारी गण के सान्निध्य में ऐसे करोड़ों युवा प्रतिवर्ष संघ विचारों का अनुसरण करते हैं।
आगामी सन २०२५ में संघ की स्थापना को १०० वर्ष पूर्ण हो रहे हैं।और सारा विश्व इस बात को एक अजूबा मानती है कि एक ऐसा संगठन जिसे केवल और केवल जन मन का सहकार्य प्राप्त है, दिनों दिन वर्धीष्णु है। इसी में संघ के चिरस्थाई मूल्यों का महत्व प्रतीत होता है। 
आइये आज हम गर्व के साथ अपने इस महान समाजसेवी को, "श्री गुरुजी" को अभिवादन करें और प्रतिज्ञा करें कि 'यावत्चंद्र दिवाकरौ' हम राष्ट्र कार्य में अपना योगदान अर्पित करते रहेंगे।
भारत माता की जय
कवि'रवि'

Wednesday, 16 February 2022

दादोजी कोंडदेव

छत्रपती शिवराय आठवताच प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयाचा ऊर भरून येतो हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. आणि आजच्या बदलत्या युगात तर छत्रपती शिवराय यांचं चरित्र हा जागतिक पाठ्यक्रमाचा विषय झालेला आहे. शिवरायांच्या ह्या उत्तुंग यशामध्ये अर्थातच त्यांच्या असंख्य ज्ञात किंवा अज्ञात योगदान आणि बलिदान सामावलेलं आहे. उदाहरणे अनेक आहेत, एका अर्थाने असेही म्हणता येईल की त्या काळी शिवरायांचा स्वराज्याचा लढा ही एक सांघिक चळवळ बनली होती आणि महाराष्ट्रातील प्रत्येक परिवार त्यात सामील होता.
शिवरायांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यास ज्या प्रमुख जनांचं लाभलं त्यात ज्या प्रमाणे त्यांचे पिता शहाजीराजे आणि माता जिजाऊ साहेब आहेत, तद्वतच दादोजी कोंडदेव यांचा प्रामुख्याने उल्लेख झालेला आपल्याला पहावयास मिळतो.
बहुधा जन्मापासूनच शिवरायांना दादोजींचं सान्निध्य लाभलं. बालपणातच शिवबांना हिंदु संस्कृती, आचार विचार, धर्मग्रंथे, "शस्त्राचार आणि शास्त्राचार" ह्याचं शिक्षण जिजाऊ आणि दादोजी ह्यांनी प्रभावीपणे दिले, ज्या कारणे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. दादोजीं विषयी इतिहासातील नोंदी अल्प असल्या तरी त्यांचं कर्तृत्व ते 'शिवरायांचे गुरू' होते येवढ्या एक वाक्यातून साकार होते.
शिवरायांच्या काळात असे अनेक अनाम वीर आहेत की ज्यांची फारशी दखल तत्कालीन इतिहासकारांनी घेतलेली दिसत नाही. असो!
आपल्या प्रौढ वयातील साधारण १६ वर्षे दादोजी हे शिवरायांच्या साथ संगतीत होते. म्हणजेच शिवरायांच्या संगोपन काळात त्यांना दादोजींचा सतत सहवास लाभला आहे असे दिसते. पुढे तोरण्यावरील शिवरायांची स्वारी मात्र दादोजींना शिवबाच्या काळजीपोटी मान्य नव्हती, असाही उल्लेख इतिहासात आढळतो. वात्सल्यापोटी कुणाही सुहृद व्यक्तीला तसे वाटावे हे स्वाभाविक आहे. त्या प्रसंगा नंतर दादोजींचा कार्यकाळ फारसा उल्लेखित नाही. त्यांचा मृत्यू वयाच्या ७२ व्या वर्षी झाला अशी नोंद आहे.
अलीकडच्या काळात अविचारी वृत्तीने काही आक्रस्ताळी मंडळी स्वराज्य उभारणीतील दादोजींचं समर्पण आणि योगदान नाकारित आहेत ही खेदाची बाब आहे.
"जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण| ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार"
ह्या संत तुकाराम महाराजांच्या ओवीतील दोन ओळी दादोजींच्या चरित्राला चपखल बसतात. येवढे बोलून मी माझे कथन पूर्ण करतो.
कवि'रवि'

Monday, 14 February 2022

स्पर्श

शर आर्त भावनांना स्पर्शून आज गेला
क्षण तप्त त्या उन्हाला स्पर्शून आज गेला
नाते जरी न काही माझे आणि तयाचे
हलकेच का मनाला स्पर्शून आज गेला
संगे सदा मनाच्या संवेदना तरंगे 
संचार भावनांचा स्पर्शून आज गेला
पार्थिव अन प्रवाही जग हे असेच आहे
आघात कोंदणांना स्पर्शून आज गेला
अतर्क्य भावविश्व कां हे 'रवि' असावे
हा एक प्रश्न मजला स्पर्शून आज गेला
कवि'रवि'

Sunday, 13 February 2022

पुलवामा शहीदी दिवस

शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले वतन पर मिटने वालों का बाकी यही निशाॅं होगा
सहस्त्र वर्षांचा इतिहास सांगतो की या देशात गद्दार जसे जन्मले त्याप्रमाणेच त्यांच्यापेक्षाही वरचढ असे बलीदानी देखील जन्माला आलेत. अलीकडच्या इतिहासातील उदाहरण घ्यावयाचे झाल्यास कश्मीर चे घेता येईल जेथे एका धार्मिक उन्मादातून देशद्रोह्यांनी कहर माजविला. त्याप्रसंगीच्या षंढ राजकारण्यांनी त्यांना एक प्रकारे मदतच केली आणि काश्मीर आतंकवादाचा गढ बनला. त्या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी देशातील व प्रांतातील सर्वच सुरक्षा यंत्रणांनी शर्थ केली आहे. एकास एक ह्या प्रमाणात देखील या यंत्रणांना आपले वीर गमवावे लागले आहेत. तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करून ह्या यंत्रणांनी नियंत्रण मिळविले आहे. सुरक्षा रक्षकांवरच्या अनेक हल्ल्या पैकी एक पुलवामा हल्ला संपूर्ण जगाला हलवून गेला.
 दहशतवादाच्या काळ्याकुट्ट इतिहासातील हा एक भयंकर दिवस आहे. पुलवामा हल्ल्याच्या विसरता न येणाऱ्या जखमांना देश आज पुन्हा स्मरण करीत आहे, पुढील हजार वर्षे करीत राहील.
 धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था कोलमडल्यानंतर किंवा नाकारल्यानंतर या देशाने सुरक्षाविषयक जी दुरावस्था अनुभवली आहे त्यातून धडा घेऊन देशाची पुढील वाटचाल व्हावी एवढेच अपेक्षित आहे 
कवि'रवि' 

Saturday, 12 February 2022

जुनून

जुनून है के अब 
देश की खातिर ही मर जाएं
नायाब सा एक काम 
ईस जनम् में कर जाएं
वक्त और दस्तूर 
जब मिल आये है साथ साथ
मौका है अपने नाम को 
अजरामर ही कर जाएं
ईस माटी का ऋण 
जो पुश्तों पे है चढा
अब अपने हाथों 
भरसक चुका जाएं
ऐ वतन तेरी सौंधी हवा 
है प्यासे दिल की दवा
सीने में आखरी सॉंस 
अब झूम के भर जाएं
कवि'रवि'

Friday, 11 February 2022

भय इथले संपत नाही

जोवर हिंदु हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे जीवंत होते तोवर भाजपा-सेना यांची दीर्घकालीन युती देखील जीवंत होती. त्यांच्या पश्चात हळूहळू स्वार्थी लोकांची कारस्थाने सुरू झालीत आणि त्याचे रुपांतर शेवटी युती तुटण्यात झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने अतीशय स्वच्छ आणि पारदर्शक असा लोकहितपूरक कारभार पाच वर्षे चालविला. सत्ता ही जनसेवेचं व्रत म्हणून कशी वापरावी याचे आदर्श उदाहरण घालून दिले. यामुळे सत्तेचा उपभोग घेण्यास आसुसलेल्या मंडळींच्या पोटात शूळ निर्माण झाला. आणि युती हवी पण देवेंद्र मुख्यमंत्री नको असा सूर जोर धरू लागला. पण भाजपा कार्यकारिणी ने त्याला भीक घातली नाही. देवेंद्राने पक्षातील स्थानिक सहकाऱ्यांशी चर्चा करून आपण युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवू अशी सूचना केंद्रीय कार्यकारिणीला केली. परंतु आपलेच काही दगाफटका करतील की काय ह्या शंकेने वरिष्ठांनी युती कायम ठेवीत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. निवडणूक पार पडली, युतीला बहुमत प्राप्त झाले. अर्थात महाराष्ट्रातील जनतेने युतीला कौल दिला. पण, अनपेक्षितपणे सेनेने धोका दिला. लोकशाही नियमानुसार ज्येष्ठ पक्षाला मुख्यमंत्री पद देण्याचा नैसर्गिक अधिकार डावलून सेनेचा मुख्यमंत्री झाला तरच युती कायम अथवा नाही असा निर्णय घेतला. 
परिणामी युती तुटली आणि जनतेने नाकारलेल्या तिय्यम, चौयम पक्षांसोबत अभद्र युती करून उद्धव ठाकरे यांनी आपली हौस भागवून घेतली. ह्या तिकडीचा हनीमून देखील पार पडला नाही, की मंत्रीमंडळातील जो तो उन्मत्त होऊ लागला. शासन कसे करावे ह्याचा कवडीचाही अनुभव नसल्याने उद्धवजींना पवार काकांच्या कुबड्या शिवाय पर्याय राहिला नाही.
महाराष्ट्रातील सत्ता केंद्र अर्थातच काकांच्या दिशेने प्रवाहित झाले आणि उद्धवजींना मातब्बर राजकारण्यांनी "मनमोहन" बनवून उभा धिंगाणा घालत सगळ्याच क्षेत्रांत घाण करून ठेवली. सेनेतील काही नेते तर स्वतः ला प्रॉक्सी मुख्यमंत्री मानून किंवा सनदप्राप्त अधिकारी समजून विचित्र निर्णय घेऊ लागले, त्यातून अभूतपूर्व भ्रष्टाचार बोकाळला आणि अराजक माजले.
ह्या परीस्थितीवर अंकुश ठेवण्यात मुख्यमंत्री असमर्थ ठरले आहेत हे अवघा महाराष्ट्र अनुभवतो आहे. सुस्थितीतील हा महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे ह्या साठी जनता चिंताग्रस्त आहे. सत्तेतील नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक भानगडी उपस्थित होत आहेत आणि त्या अनुषंगाने सी बी आय, एन आय ए, ई डी किंवा न्यायालय ह्या संस्था सक्रिय झाल्या आहेत. एक एक भ्रष्ट राजकारणी न्यायालयाच्या कचाट्यात सापडत चालला आहे आणि शिक्षेस पात्र देखील ठरत आहे. राज्याची आता काय हालत झालीय हे महाराष्ट्रातील जनतेला पूर्णपणे कळून चुकले आहे.
आणि म्हणूनच "भय इथले संपत नाही"
कवि'रवि'

Thursday, 10 February 2022

तुका म्हणे ऐशा नरा

तुका म्हणे ऐशा नरा...मोजुनी माराव्या पैजारा
वरील वाक्य संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही पण एका ओळीत बराच अर्थ गर्भित आहे म्हणून त्याचा उपयोग केला आहे एवढेच.
तर मुद्दा असा आहे की वर्तमान काळात महाराष्ट्र देशी "त्रिपाद शासन व्यवस्था" डोलकाठी वर स्वार होऊन यशस्वी पणाचा आव आणित आहे. इतुके नसे थोडके म्हणून वरतून त्यांचे 'बोलके भांडे' मनातील मांडे सकाळी सकाळी अवतरणाऱ्या डोमकावळा वृत्तीच्या 'भ्रमित वृत्तशल्यकारांसमोर' वाजण्यासाठी तत्पर असतात. आणि ते शल्यकार बरळलेल्या प्रत्येक वाक्याची सोईस्कर चिरफाड करून तुम्हां आम्हाला पेश करतात. वरतून आव असा की तत्वज्ञान सांगताहेत. असो! 
आम्ही असे ऐकले आहे की रावतांच्या कोणातरी एकाला इडी झोंबलीय आणि त्याचा शूळ रावतांच्या कोणातरी दुसऱ्याला उठलाय. झाले,मग काय पहाटे अवतरलेल्या डोमकावळ्यांच्या चोचीत पडला की बातमीचा तुकडा. म्हणे इडी नावाची इंगळी निरपराधांची झाडाझडती घेत आहे, ह्यात शुद्ध राजकारण आहे, हे बरे नव्हे वगैरे वगैरे. 
सत्ताधारी होणं म्हणजे जणू काही सर्व गुन्हे माफ ठरणं असं एक समीकरण "खानग्रेसी" सरकारांनी स्थापित करून ठेवले होते. हे सत्य असलं तरी आता शुद्धीकरण मोहिमेत ती अडगळ दूर झालीय आणि भल्याभल्यांची नर्तनकला विफल ठरली आहे. तेंव्हा हे संजया धृतराष्ट्रासंगतीचा तुझा हा खेळ रणात हरलेल्या दुर्योधनाला भूमिगत व्हायला आणि तुला अस्तंगत व्हायला कारणीभूत ठरणारा आहे. 
विलाप करीत बसण्या व्यतिरिक्त आता कोणतीही शिष्टाई उपयोगी पडणार नाही. पेराल ते उगवेल ह्या उक्तीप्रमाणे आता फळं चाखावीच लागणार आहेत. ह्या जन्मीचं ह्या जन्मीच फेडावं लागणार अशी ह्या एकविसाव्या शतकाची करणी आहे. 
अंती इतुकेच सांगणे आहे की बेडुक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, आणि सरड्याच्या शापाने सिंह मरत नाही. आता पश्चात्ताप किंवा प्रायश्चित्त ह्यासाठी एकच डेस्टिनेशन आहे, ते म्हणजे ह्या सदा वत्सल मातृभूमी वरील कोणते तरी कारागृह!! तथास्तु.. तथास्तु
कवि 'रवि'


Wednesday, 9 February 2022

रामराम भौ

माव्या साऱ्या भावाईले मावा पायटुनचा रामराम. झाली अशिन ना भौ तुमच्या वाली च्या न्यायरी? तं मंग चला जरा फिऱ्याले, यिवू पाहून कुठी कुठी काय व्हवून ऱ्हायलं ते!
हाव ना भौ, तिकळे पाच राज्यात विलक्षन व्हनार म्हंते बॉ. व्हवू द्या, आपल्याले कां करा लागते!? पन न्हाई राजे हो, त्या बंबई वाल्या संज्याले लयंच उत येयेल हाये. कां तं म्हंते आता मीच व्हईन ऊ पी चा शी यम आन माया भाकर खाऊ घालनाऱ्या मालकाले बनोतो पी यम.
 कां तं म्हंते बावा थे वाईन कां काय थे दारू नोय तं म्हंते नै तर्न्याईचं डिरिंक हाय म्हंते. मी म्हनो तवाच तं याच्या काट्ट्या तथी भागिनदारी कऱ्याले हरिकल्या. मले तं मोजता बी येत नाई भौ इतले करोळ त्या पोट्ट्याईनं भागिनदारीत पयलेच कमावले हायेत. मंधात थ्या कांगना बाईले म्हने हरामखोर, जवा बरसली कानि थे ह्या बयाळ्यावर तं मंग म्हंते कसा का हरामखोर म्हंजे विंग्रजी मंदी नौटी का काय थे होते. आता कां कराव भौ अशा दिड शायन्याचं सांगा राजे हो. मी म्हंतो भौ तुह्यावाली आन माह्यावाली भाषा कोन्ती? मराठी हाय का नाई! समजा आजुक फुळे जायाचं आशिन तं हात तंग असला तरी हिंदी हाये कानि संगतिले? मंग नस्ता आगाऊपना करून थ्या विंग्रजी भाषेचं गाढव अंगावर कां म्हून घेते लेक? नौटी म्हंजे हरामखोर काय वाईन म्हंजे दारू नस्ते काय, हा अर्ध्या हयकुंडात पिवळा व्हयेल बेलना आता तुम्हा आम्हा साऱ्याईले च्यूत्या समज्याले लागला भौ, तवा ह्येच्या पोतडीवर दन्के द्याच लागतिन तवा याचा भेजा जागीवर यीन राजे हो. अथी भरून ठूली आन आता म्हंते ऊ पी त जातो, ह्याले ठाव हाय काय, तथी लोकं निरे टपून बशेल हायेत का कवा हा येते आन कवा थे घोयसतात. नाई मंजी गेल्या बारीनं बी ह्याले चुयमुंग्या सुटल्या व्हत्या तं साऱ्याईचं डिपाजिट जप्त झाल्तं. या बारीनं तं मले वाट्टे हा सोता बी जप्तित जाईन का कानू बॉ. 
पायजा भौ आपल्या संत महंतायनं आपल्याले सांगून ठुयेल हाये का रागिट शायना पुरला पन गोडबोल्या मूर्ख काई कामाचा नसते. तवा आपुन थेच करू जे संतायनं शिकोलं. 
तुमाले काय वाट्टे थे तुमी मले लिवून पाठोसान ह्याची खात्री हाये मले. तवा आता रामराम घेवा अन् शायन्याईच्या बाजूनं जावा.
🙏 रामराम 🙏
कवि'रवि'

संजय- जरा दम खा

ये खामोश सा मंज़र, ये थमती हवाएं
ये कहती तुम्हें है न बदली फिजाएं
तू इतना समझले ऐ नादाॅं मुसाफ़िर
है तूफान आगे ज़रा कर वफाएं
के आगोश तेरा है बहुत तंग फिर भी
चला जा रहा तू निगलने दिशाएं
है जिसपर सवार वो आबे बुलबुला है
हश्रे बेवकूफी तुझे गर्त ही मिला है
है चट्टान सा वो देवेंद्र भाई 
ठहर जा तेरी यूं करेगा धुलाई
के तू भी भुलेगा जो है नाम तेरा
रे संजय खुलेगा फितरत का पिटारा
कवि'रवि'

Tuesday, 8 February 2022

विदेशी बांडगुळांवर बहिष्कार घाला

भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान करणाऱ्या विदेशी बांडगुळांवर बहिष्कार घाला:

काही दिवसांपूर्वी हा विक्षिप्त उद्दामपणा  विदेशी परंतु भारतातील व्यवसायावर उन्मत्त झालेल्या ह्युंदाई, के एफ सी वगैरे सारख्या कंपन्यांनी पाकिस्तानात केला आहे. पाकड्यांना खुश करण्यासाठी या अधमांनी तेथे काश्मीर डे ला पूरक अशा जाहिराती प्रसिद्ध केल्यात. अभिमानाने सांगावेसे वाटते की आपल्या देशाविषयी जाज्वल्य अभिमान बाळगणारा आजचा तरुण वर्ग पेटून उठला आणि त्यांनी सोशल मीडिया वर ह्या कंपन्यांच्या विरुद्ध रान उठवले आणि त्यांना सळो की पळो करून सोडले आहे. "बॉयकॉट ह्युंदाई" हा ट्रेंड इतका जोरात चालला आहे की कंपनीच्या तंबूत घबराट पसरली आहे. हा तरुण वर्ग येथवरच थांबला नाही तर त्यांनी बुकींग रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. हीच खरी राष्ट्रीय भावना असते. 

चला आपणही आपल्या परीने प्रयत्न करुया आणि ह्या मस्तवाल कंपन्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शक्य ते सहकार्य करुया.

कवि 'रवि'

ढोंगी बगळा आणि परोपकारी खेकडा

कृष्ण शास्त्री चिपळूणकरांची बकान्योक्ती प्रसिद्ध आहे तीचा मतितार्थ असा: 
एका जंगलात एक तलाव होता आणि त्या तलावात सुंदर सुंदर मासे अति आनंदाने विहार करीत होते. सद्गुणांनी युक्त अशी ती मासे मंडळी आस्थावान होती. दु:खाची व्याख्या देखील त्यांना ठाऊक नव्हती. अशा ठिकाणी एक शुभ्र धवल बगळा फिरत फिरत पोचला. त्याला त्या सुंदर तलावातील माश्यांना आनंदाने विहार करताना बघून खूप ईर्षा उत्पन्न झाली आणि त्यांना खाण्यासाठी तो लालचावला. पण त्यांची एकी बघून त्याला प्रश्न पडला की ह्यांना खावे तरी कसे? 
बराच विचार करून त्याने एक युक्ती शोधून काढली आणि आपल्या कामाला लागला. 
भल्या पहाटे तळ्यामध्ये एक साधू एका पायावर तपश्चर्या करीत आहे असे दिसताच संपूर्ण तळ्यात ती वार्ता पसरली आणि तळ्यातील जीव त्याचं दर्शन घेण्यासाठी पोहचू लागली. बगळा एकाग्रतेने सर्वांना नकळत परिस्थिती न्याहाळत होता. एक दिवस गेला... दोन दिवस गेले, असे करता करता तळ्यातील जीवांची खात्री पटली की हा बगळा महान तपस्वी आहे आणि निर्धास्त होऊन ते त्याचे भोवती निश्चिंतपणे फिरू लागले. 
हां हां म्हणता तळ्यातील माशांना हे ध्यानात येऊ लागले की आपली संख्या लक्षणीयरीत्या कमी होत आहे आणि हा चिंतेचा विषय आहे. 
त्यांनी ह्या करिता सर्व सुजाण जलचर प्राण्यांची सभा बोलावली आणि निष्कर्ष द्यावा अशी विनंती केली. शोधक दृष्टी असलेल्या खेकड्याने नेमके काय होते आहे ते शोधले आणि सभे समक्ष हे स्पष्ट केले की हा बगळा धूर्त आहे आणि मासे खावून फस्त करीत आहे. मी पाण्याबाहेर पलीकडे माश्यांच्या हाडांची रास बघून आलो आहे. 
झाले! माश्यांमध्ये एकच हाहाकार माजला. सर्व भयभीत झाली.पण काय तोडगा काढावा ते कुणाला कळेना. ह्या बगळ्याचा कायम काटा काढला जावा ह्यावर एकमत झाले पण तोडगा सुचेना. काही क्षण विचार करून कासवाने एक प्रस्ताव मांडला. कासव म्हणाले, ह्या ढोंग्याचा काटा काढायचा असेल तर खेकड्याला मी सुचवतो ते त्याने करावे. थोडी जोखीम आहे पण हे शक्य आहे. खेकडा तयार झाला आणि कासवाच्या युक्ती वर अंमल करायचे ठरले. 
दुसरे दिवशी बगळ्याभोवती एकही मासा फिरकला नाही, बगळा आश्चर्य चकित झाला. त्याच्या मनात शंका उद्भवली की काय माझे ढोंग ह्या माशांना कळले की काय? सलग तीन चार दिवस असेच घडले तेव्हा न राहवून त्याने शेजारी फिरत असलेल्या खेकड्याला विचारणा केली. चतुर खेकड्याने आढेवेढे घेत त्याला सांगितले की तळ्यातील माशांची घटलेली संख्या त्यांच्या लक्षात आली आहे आणि त्यांना तुझ्या वर संशय आला आहे. ते ऐकून बगळा गडबडला खरा पण क्षणात स्वतः ला सावरून त्याला म्हणाला, मित्रा! होय हे खरे आहे की ह्या तळ्यातील मासे कमी होण्यास मीच कारणीभूत आहे. परंतु, मी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार दुसऱ्या ह्या तळ्याहूनही सुंदर तळ्यामध्ये जाण्यासाठी मदत केली आहे आणि ते तेथे अत्यानंदाने रहात आहेत. हे ऐकून खेकड्याने संमती दर्शवली आणि मी इतर सर्वांना हे सांगून त्यांचं शंका निरसन करतो असे सांगून निघून गेला. 
पुन्हा सगळे प्राणी एकत्र झाले आणि खेकड्याने वृत्तांत सांगितला. सर्वानुमते असे ठरले की उद्या आपण सगळे मिळून बगळ्या जवळ जाऊ आणि ह्याची शहानिशा करू. ठरल्याप्रमाणे सगळे बगळ्या जवळ पोचले आणि त्याने खेकड्याला जे सांगितले ते खरे कां अशी विचारणा केली. बगळ्याने चेहऱ्यावर सात्विक भाव आणून मोठ्या आविर्भावात त्यांना सांगितले की होय हे खरे आहे. खात्री करायची असल्यास मी उद्या खेकड्याला सोबत घेऊन जाईन आणि दाखवून आणिन. त्यालाही त्या रम्य ठिकाणी रहायला खूप आवडेल अशी पुस्तीही जोडली. सर्वांनी त्यास अनुमती दिली. 
खेकडा बरोबर समजला की हा माझा ही घात करायला बघतोय. त्याने आपल्या मनात एक योजना आखली आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बगळ्या सोबत तिकडे जाण्यासाठी पोचला. तळ्यातील इतर प्राणी त्यांना जाताना बघायला जमलेच होते. 
बगळ्याने मोठ्या उत्साहात खेकड्याला आपल्या पाठीवर बसवले आणि उडत उडत निघाला. तळ्यापासून दूर पोचल्या वर त्याने खेकड्याला खाली पाडायचा प्रयत्न सुरू केला. हे कळताच खेकडा त्याला म्हणाला स्वामीजी सावकाश! नाहीतर मी खाली पडेन. उन्मत्त बगळा गर्वाने त्याला म्हणाला 'अरे मूर्खा, मी तुला इतक्या उंचीवर आणलेच एवढ्यासाठी आहे की तुला फेकून देईन आणि तुला संपवून तळ्याकडे परत जाईन. तळ्यातील प्राण्यांना सांगेन की खेकडा तिकडेच रमला. आणि अशा रितीने मी सगळ्या माशांचा फडशा पाडीन.
येवढे ऐकताच खेकड्याने त्याच्या गळ्यात आपल्या नांग्या घुसवल्या. बगळा विव्हळू लागला तसा खेकडा उद्गारला अरे धूर्ता तुझं कपट सगळ्यांनी ओळखलं आहे आणि त्या योजनेनुसारच मी तुझा अंत करण्यासाठी तुझ्या सोबत आलो आहे. बगळा होलपटत जमिनीवर पडला आणि गतप्राण झाला. 
तात्पर्य: ढोंग काही काळापुरते यशस्वी होते पण सार्वकालिक नसते. ज्ञानियांच्या योगे कपटियांचा अंत होतोच. 
मूळ बकान्योक्ति ही अशी आहे:-
उभा राहे एके चरणी धरणी ते धरुनिया
तपश्चर्या वाटे करित जणू डोळे मिटुनिया
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेची ठकती
परि ज्ञाते तुझे कपट लवलाही उमजती

वर्तमानातील बगळे कोण, मासे कोण आणि त्यांचा तारणहार खेकडा कोण हे समजावयास आपण सगळे सूज्ञ आहात.
कवि'रवि'

Monday, 7 February 2022

आयुष्याच्या निसरड्या वाटा

आयुष्याच्या निसरड्या वाटा, 
त्यात पायात रुतला काटा 
धडपडत,पडत झडत,
कुथत रडत,भांडत सांडत 
वेचत चाललोय 
वाट्याला आलेला प्रत्येक वाटा 
श्र्वासांची बेरीज की वजाबाकी 
ह्या चिंतेस देवून फाटा 
आठवांचे थवे 
नि:शब्द मनांत रूंजी घालतात उतारावर आंब्याच्या वनातली कोकिळा आतां
 रूदन करते 
कॉंक्रीटच्या जंगलातील ऊंच ऊंच पठारावर पहाटेच्या सूर्याचे ते ऊगवणे 
आता टिव्हीत सामावले
 मंदीरातील घंटानादाचे कंत्राट
 एफ् एम् ने कमावले 
पहाटे 
तुका,ज्ञाना, सोपान,मुक्ता, आणि असे संत कानाकानात भेटायचे, 
हरवून जायची  मनींची भ्रांत 
अन्न, वस्त्र, निवारा 
आणि ह्यापुढे एक तो ईश्वर
 ऊद्याच्या मृगजळामागे 
आज फिरतो मी जरी ते नश्वर
© कवि'रवि' 

Saturday, 5 February 2022

लता दीदी:अखेरचा श्वास


हो जयाच्या संगतीने श्वास आम्ही साधला
आज त्या श्वासासवे तो सूर की हो निमाला
ती प्रभातीची भुपाळी अन देव दर्शन ते दिसे
कां म्हणोनि लुप्त व्हावे एका क्षणी हो ते असे
धुंद ते तारुण्य अमुचे पोसले तव गीतांसवे
स्वर तो आता नसे फक्त उरली आसवे
प्रेम,करुणा,विररस अन् देवभक्ती त्वा गायिली
होय गे लताबाई ती देशभक्ती ही त्वा दिली
स्वरांकित ती तव गायकी विलसली सृष्टी की जणू
मज पोरके तू करुनी गेली ह्या परी मी काय म्हणू
एकची मागणे हे ईश्वरा तुज मागतो मी ह्या क्षणी
दे तिला सहवास स्वर्गी, राहू दे तव चरणी 🙏🙏
कवि 'रवि'

Wednesday, 2 February 2022

वक्तृत्व

वक्तृत्वा" करिता दातृत्व, मातृत्व आणि भ्रातृत्व हे तीन भाव अंतर्भूत असणे आवश्यक आहे आणि तितकेच महत्त्वाचे आहे. ज्याच्या अंगी समाजाला काही देण्याची भावना असते तो त्या दातृत्वापोटी विचारांचं दालन उघडून दान करीत असतो. ज्याचे अंगी मातृत्व असते तो विचारांचं सृजन करतो आणि भ्रातृत्वाची ऊर्मी ज्यांचं जीवन व्यापून असते तेच अनेक विचारांची योग्य सांगड घालून वक्तव्य करण्यात सफल होतात. पोपटपंची करणारे बहू असू देत पण त्यांच्या वक्तृत्वाची छाप पडत नाही. व्यासंगी विद्वान होऊ शकतो परंतु सृजनशील हा खऱ्याअर्थाने विचार प्रवर्तक असतो. 
संत तुकाराम किंवा समर्थ रामदास हे अजोड कवि समाजासाठी विचार प्रवर्तक ठरले ह्यामागे त्यांच्या वैचारिक पातळीची उत्तुंगता ध्यानी येते. 
जगातील अशा सर्व सृजनात्मक कार्य करणाऱ्या भाषाविदांना आणि त्याद्वारे सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या विभूतिंना सादर नमन 🙏
कवि'रवि'

मला उमगलेले नेताजी

 जय श्रीराम
स्वतंत्र भारतातील राष्ट्रनिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आधुनिक भारताचे शिल्पकार अशी आजची तरुण पिढी, अशा सर्वांसमोर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आयुष्य खपविले अशा वीरांचे अग्रणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी थोडक्यात कथन करण्याची संधी मला मिळावी ह्यातच मी धन्यता मानतो. संघ स्वयंसेवकांच्या समक्ष बोलताना शिस्तीचे आयाम पाळावेच लागतात ह्याची जाण ठेवून मी शब्दांची निवड करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे, काही चुका झाल्यास आपणा सर्वांनी समजून घ्यावे ही विनंती आहे.नेताजी- स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तिमत्वांपैकी असं एक नाव आहे की आजही त्यांच्या चरित्राचं गारुड एतद्देशीय नवतरुणांवर प्रचंड आहे, असं वाटतं आज पुन्हा जर कां नेताजी समोर येऊन ह्या तरुणांना आवाहन करतील की "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा" तर ह्या नौजवान भारतातील एकूण एक तरुण देशासाठी सर्वस्व दान करायला धावून जाईल. रक्त ही देईल आणि मायभूमी ला शत्रूच्या रक्ताचा अभिषेक ही घडवील. अर्थात आता आजादी हा काही परकियांकडून मिळण्याचा विषय राहिला नाही परंतु परकियांनी लादलेल्या वैचारिक जोखडातून आपण अजून पर्यंत सुटका करून घेऊ शकलो नाही.मला वाटतं नेताजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला असावा. कारण की त्यांच्या अनेक कृतीतून छत्रपती शिवराय दिसतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नेताजींचं बुद्धी कौशल्य प्रखरपणे दिसून येते. आपल्या पैकी बहुतेकांनी त्यांचं चरित्र अभ्यासलं असेल, अनेकांनी व्हिडिओ मार्फत त्यांना अनुभवलं असेल. त्यामुळे त्या पैलूंवर बोलण्याऐवजी त्यांनी अवलंबिलेली राष्ट्रीय जबाबदारी आणि त्यासाठी आवश्यक असलेलं अत्युच्च दर्जाचं नियोजन हे विशिष्ट बिंदू मला महत्वाचे वाटतात.ज्या इंडियन नॅशनल काँग्रेस चे ते सदस्य होते, त्या काॅंग्रेस मधील शीर्ष नेतृत्वाने त्यांचा कायम उपमर्द केला, त्यांच्या विरोधात वेळप्रसंगी शत्रूशी संगनमत करून त्यांना नामोहरम करण्यासाठी कुटिल कारस्थाने केलीत त्याच कॉंग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील निवडून आले, ह्यातून त्यांची जीद्द आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचं सातत्य उल्लेखनीय आहे. जगातील त्या काळातील सर्वोच्च शक्तिकेंद्रे देखील नेताजी ह्याचं नेतृत्व मानीत असत ह्याची उदाहरणे स्वातंत्र्याच्या इतिहासात नमूद आहेत. अत्यंत क्रूर हुकुमशहा म्हणून ज्या हिटलरला जग ओळखते, त्या हिटलरला सुद्धा प्रसंगी त्याच्याच गडामध्ये नडायला मागेपुढे न पाहणाऱ्या नेताजींना आठवताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या औरंगजेब भेटीचं उदाहरण हुबेहूब डोळ्यासमोर येते. स्वातंत्र्य वीर सावरकरांचं आराध्य देखील शिवाजी महाराज च होते हे याठिकाणी प्रकर्षानं नमूद करावेसे वाटते. बदलत्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा नेताजींना आठवताना मला देशाचे विद्यमान प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदींचा दृष्टीकोन राष्ट्र हिताशी किती जवळीक साधून आहे, ते प्रकर्षाने जाणवते. आणि पुढील काळासाठी संघाच्या ह्या स्वयंसेवकाची अर्थात मोदीजींची राष्ट्र उभारणीसाठी ची आंतरिक तळमळ दिसून येते.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सारख्या उत्तुंग नेतृत्वाविषयी माझ्या सारख्याने आकलन करणं आणि त्यावर भाष्य करणं हे काजव्याने सूर्याला प्रकाश दाखविण्या सारखं आहे. त्यांच्या बद्दल बोलताना भावना अनावर होतात त्यामुळे काही चुका झाल्या असतील तरआपण सर्व सुजाण मंडळी मला उदार अंतःकरणाने क्षमा करावी अशी विनंती करतो.जय हिंद वंदे मातरम् भारत माता की जयकवि'रवि'